केंद्र सरकारकडून सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीवर भर देण्यात असतानाच धोकादायक कीटकनाशकांविरुद्ध कारवाईही सुरू केली आहे. केंद्र सरकारने दोन कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन अशी त्यांची नावे आहेत. Big news Central government bans these two pesticides, companies will not be able to sell them after 2024
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीवर भर देण्यात असतानाच धोकादायक कीटकनाशकांविरुद्ध कारवाईही सुरू केली आहे. केंद्र सरकारने दोन कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन अशी त्यांची नावे आहेत.
टोमॅटो आणि सफरचंद पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो असे म्हणतात. केंद्राच्या आदेशानंतर आता 2024 नंतर भारतीय कंपन्या या दोन कीटकनाशकांची विक्री करू शकणार नाहीत. या दोन्ही रसायनांमध्ये पीक संसर्ग रोखण्याची क्षमता आहे, परंतु ते ग्राहकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात, असा दावा केला जातोय.
केंद्र सरकारने यापूर्वी 27 कीटकनाशकांवर बंदी घातली असून ती धोकादायक ठरवली आहेत. मात्र, ती बनवणाऱ्या लॉबीच्या दबावाखाली या निर्णयाची आजवर अंमलबजावणी झालेली नाही. या कीटकनाशकांचे फायदे आणि तोटे यांचा आढावा घेतला जात आहे. आता सरकारला ते मानवी जीवनासाठी धोकादायक वाटले तर त्यांच्यावर बंदीची मोहोर उमटू शकते. सध्या दोन नवीन कीटकनाशकांवर बंदीचा मुद्दा चर्चेत आहे.
केंद्राने 1 फेब्रुवारी 2022 पासून स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन नावाच्या कीटकनाशकांच्या आयात आणि उत्पादनावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कंपन्यांनी कच्चा माल मागवला आहे, त्यांना जुना साठा काढण्यासाठी वेळ दिला जाईल. या दोन्हींचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ३१ जानेवारी २०२२ ते २०२४ पर्यंत यापासून तयार केलेली उत्पादने विकू शकतील. हे बुरशीनाशक आणि जीवाणूजन्य वनस्पती रोग नियंत्रक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App