वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानमध्ये भजनलाल सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी 22 मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये 12 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. किरोडीलाल मीणा खासदारपद सोडून आमदार झाले, राज्यवर्धन सिंह राठोड यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता 25 वर पोहोचली आहेBhajanlal Cabinet swearing-in ceremony in Rajasthan, 22 ministers take oath; 12 Cabinet, 10 Ministers of State
भाजपने श्रीकरणपूर मतदारसंघातून आपले उमेदवार सुरेंद्र पाल सिंग टीटी यांना मंत्री केले आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये उमेदवाराला मंत्री बनवण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे श्रीकरणपूर मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली असून, तेथे 5 जानेवारीला मतदान होणार आहे. नियमांनुसार कोणताही प्रौढ भारतीय नागरिक आमदार न होता सहा महिने मंत्री राहू शकतो.
कॅबिनेट मंत्री
किरोडीलाल मीना, गजेंद्र सिंह खिंवसार, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबुलाल खराडी, मदन दिलावर, जोगाराम पटेल, सुरेश सिंग रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीना, कन्हैयालाल चौधरी, सुमित गोदारा.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
संजय शर्मा, गौतम कुमार डाक, जबर सिंग खरा, सुरेंद्र पाल टीटी, हिरालाल नगर.
राज्यमंत्री
ओत्राम देवासी, विजय सिंह चौधरी, मंजू बागमार, केके विश्नोई, जवाहर सिंग बेधम.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App