प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरातमधील नरोडा गाव (गाम) दंगलीप्रकरणी विशेष न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. 20 एप्रिल रोजी विशेष एसआयटी न्यायाधीश एसके बक्षी यांच्या न्यायालयाने 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 2002 मध्ये झालेल्या या दंगलींमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तपासाच्या आधारे पोलिसांनी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह 86 जणांवर आरोप केले होते. या 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. 21 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे.’Appeal bhi tum, dalil bhi tum…’ Owaisi criticizes acquittal of accused in Naroda riots
हा निर्णय आल्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राहत इंदौरी यांची एक कविता पोस्ट करत AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लिहिले आहे की, ”जिधर से गुजरो धुआं बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो. तुम्हे सियासत ने हक दिया है, हरी जमीनों को लाल कर दो. अपील भी तुम, दलील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम, जिसे भी चाहो हराम कह दो, जिसे भी चाहो हलाल कर दो.’
Jidhar se guzro dhuaan bichha do, Jahaan bhi pahucho dhamaal kar do.Tumhe siyasat ne haq diya hai, Hari zameeno ko laal kar do. Appeal bhi tum, daleel bhi tum, Gawaah bhi tum, waqeel bhi tum. Jise bhi chaho haraam keh do, Jise bhi chaho Halal kar do@rahatindori https://t.co/OebayayCnf — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 20, 2023
Jidhar se guzro dhuaan bichha do, Jahaan bhi pahucho dhamaal kar do.Tumhe siyasat ne haq diya hai, Hari zameeno ko laal kar do. Appeal bhi tum, daleel bhi tum, Gawaah bhi tum, waqeel bhi tum. Jise bhi chaho haraam keh do, Jise bhi chaho Halal kar do@rahatindori https://t.co/OebayayCnf
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 20, 2023
या निकालानंतर आरजेडी नेते मनोज कुमार झा यांनीही निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, नरोडा येथे काहीही झाले नाही. कोणीही मेले नाही, बस एवढीच बाब आहे. जय हिंद.
त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनीही निकालानंतर ट्विट केले आहे. 11 मुस्लिम मारले गेल्याचे त्यांनी सांगितले. नरोडा गावातील त्यांची घरे जाळण्यात आली. माया कोडनानी हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या साक्षीदारांचे काय झाले? गुजरातची न्यायव्यवस्था लज्जास्पद! नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. लवकरच, आम्ही हेदेखील ऐकू की तेथे कोणताही नरसंहार झाला नाही!
2002 मध्ये गोध्रामध्ये चालत्या ट्रेनला आग लागली होती. या अपघातात 58 जणांचा मृत्यू झाला होता. गोध्रा घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान अहमदाबादच्या नरोडा गावात जातीय हिंसाचार पसरला होता.
गोध्रा घटनेनंतर 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती. 28 फेब्रुवारी रोजी नरोडा परिसरात काही लोकांच्या जमावाने दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. सकाळी 9ची वेळ असावी, गर्दी खूप वाढली होती, घरांचे दरवाजे बंद होते. दरम्यान, जमावाकडूनच हिंसाचार सुरू झाला, दगडफेक सुरू झाली, काही मिनिटांतच नरोडा गावातील संपूर्ण चित्रच बदलून गेले. जाळपोळ, तोडफोड असे दृश्य सर्वत्र दिसत होते आणि 11 जणांचा मृत्यू झाला होता. नरोडा गाव आणि नरोडा पाटिया हे दोन्ही भाग हिंसाचाराचे लक्ष्य होते आणि नरोडा पाटिया येथे 97 लोकांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App