
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीनमध्ये वीरमरण आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. भाजप नेते अमित मालवीय यांनी अग्निवीरच्या मृत्यूबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप ‘पूर्णपणे निराधार आणि बेजबाबदार’ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “अग्नीवीर गवते अक्षय लक्ष्मण गवते यांनी सेवेत आपला जीव गमावला आहे आणि त्यामुळे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेला सैनिक म्हणून नुकसान भरपाई मिळण्याचे ते हक्कदार आहेत.”Amit Malviya advises Gandhi not to spread fake news, Rahul Gandhi’s allegations in Agnivir death case are baseless
अमित मालवीय यांनी सोशल साइटवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, याअंतर्गत अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना 48 लाख रुपयांच्या वीमा, 44 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम, अग्निवीरद्वारे योगदान केलेली सेवा निधी (30 टक्के) सरकारच्या समान योगदानासह, तसेच त्यावर व्याजाची रक्कमही दिली जाईल.”
अग्निवीरच्या मृत्यूला चार वर्षे पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला हे लाभ मिळतील
भाजप नेते अमित मालवीय यांनी दावा केला की, त्यांच्या मृत्यूच्या तारखेपासून 4 वर्षे पूर्ण होईपर्यंत, अग्निवीरच्या कुटुंबाला त्यांच्या उर्वरित सेवा कालावधीसाठी पगार मिळेल, जो 13 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. सशस्त्र सेना युद्ध अपघात निधीतूनही 8 लाख रुपये मिळतील.
Absolute trash and irresponsible tweet.
Agniveer Gawate Akshay Laxman has laid down his life in course of service and therefore is entitled to emoluments as a Battle Casualty.
Accordingly, Laxman’s Next of Kin will receive the ₹48 lakh non contributory insurance, ex-gratia of… https://t.co/3PgsKD1F0T
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) October 22, 2023
मालवीय यांचा गांधींना फेक न्यूज न पसरवण्याचा सल्ला
पुढे, अमित मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल यांना फेक न्यूज पसरवू नका असा सल्ला दिला आहे. अमित मालवीय यांनी लिहिले, “म्हणून खोट्या बातम्या पसरवू नका. तुम्ही पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगता, प्रयत्न करा आणि तसे वागा.
सियाचीनमध्ये कर्तव्यावर असलेल्या अग्निवीरचा मृत्यू
बुलढाण्याचे अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना शनिवारी पहाटे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अग्निवीर हा भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा प्लॅन असल्याचे ते म्हणाले होते. ते म्हणाले की, अग्निवीरच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन किंवा इतर लाभ दिले जात नाहीत. सोशल साइटवर एका पोस्टमध्ये “लष्करी सुविधा नाही, आणि शहीद झाल्यास कुटुंबाला पेन्शन नाही. अग्निवीर ही भारताच्या वीरांचा अपमान करण्याची योजना आहे,” असे त्यांनी लिहिले होते.
Amit Malviya advises Gandhi not to spread fake news, Rahul Gandhi’s allegations in Agnivir death case are baseless
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्यांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं, तरी निधी वाटप फडणवीसांच्या सूचनेनुसारच – रोहित पवार
- ड्रग्स प्रकरणातली नावे जाहीर करायला सांगून सुप्रिया सुळेंचे फडणवीसांवर ताशेरे; पण त्या “एक्स्पोज” कुणाला करताहेत??
- सहा जागांचा अहंकार; I.N.D.I आघाडी बुडवणार!!