दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला त्यांच्या पक्षाला संधी देण्याचे आवाहन केले. भाषणाच्या सुरुवातीलाच केजरीवाल म्हणाले, ‘केम छो?AAP’s eye on Gujarat Arvind Kejriwal-Bhagwant Mann’s road show in Ahmedabad, said- Delhi-Punjab is done, now
वृत्तसंस्था
अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला त्यांच्या पक्षाला संधी देण्याचे आवाहन केले. भाषणाच्या सुरुवातीलाच केजरीवाल म्हणाले, ‘केम छो?
रोड शोदरम्यान अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्हाला राजकारण कसे करायचे हे माहिती नाही, देशभक्ती कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. देवाचा करिष्मा आहे, नाहीतर आम्ही छोटी माणसं, जी 10 वर्षांपूर्वी कोणालाही माहिती नव्हती, आधी दिल्लीत सरकार बनवले, नंतर पंजाबमध्ये मी सरकार स्थापन केले आहे, देवाचीच इच्छा आहे.
#WATCH दिल्ली में कोई पैसे मांगता है तो कहते हैं केजरीवाल आ जाएगा। पंजाब में कोई पैसे मांगता है तो कहते हैं भगवंत मान आ जाएगा, इन्होंने 10 दिन में भ्रष्टाचार खत्म कर दिया। गुजरात में भाजपा को 25 साल हो गए, यहां पर भ्रष्टाचार खत्म नहीं हुआ: अहमदाबाद में दिल्ली CM अरविंद केजरीवाल pic.twitter.com/vau5JLfoSe — ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2022
#WATCH दिल्ली में कोई पैसे मांगता है तो कहते हैं केजरीवाल आ जाएगा। पंजाब में कोई पैसे मांगता है तो कहते हैं भगवंत मान आ जाएगा, इन्होंने 10 दिन में भ्रष्टाचार खत्म कर दिया। गुजरात में भाजपा को 25 साल हो गए, यहां पर भ्रष्टाचार खत्म नहीं हुआ: अहमदाबाद में दिल्ली CM अरविंद केजरीवाल pic.twitter.com/vau5JLfoSe
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2022
दिल्लीत वीज आणि पाणी मोफत केले : केजरीवाल
ते म्हणाले, “आम्ही दिल्लीत वीज आणि पाणी मोफत केले आहे. भ्रष्टाचार संपला आहे. दिल्लीत तुमच्या कामासाठी कोणी पैसे मागत नाही. पंजाबमध्ये भगवंत मान यांनी 10 दिवसांत भ्रष्टाचार संपवला आहे. पंजाबमध्ये कुणी पैसे मागिते तर लोक म्हणतात भगवंत मान आ जाएगा, दिल्लीत झाले, तर लोक म्हणतात केजरीवाल आ जाएगा.”
केजरीवाल म्हणाले, “आज गुजरातमधून एक माणूस माझ्याकडे आला. तो म्हणाला की भाजपवाले लोकांचे ऐकत नाहीत, आता त्यांना अहंकार आला आहे. 25 वर्षे तुम्ही त्यांना संधी दिली, आम्हाला संधी द्या आणि बघा. पंजाबमध्ये आणि दिल्लीनेही आम्हाला दिली आणि आम्ही कामे करून दाखवली आहेत. इथेही संधी मिळाली तर काम करून दाखवू.”
‘भगवंत मान यांनी 10 दिवसांत पंजाबमधील भ्रष्टाचार संपवला’
ते पुढे म्हणाले, “भगवंत मान यांनी 10 दिवसांत पंजाबमधील भ्रष्टाचार संपवला, मग 25 वर्षांत गुजरातमधून भ्रष्टाचार का नाहीसा केला जात नाही. आम आदमी पार्टीला एक संधी द्या, आम्ही आवडलो नाही, तर पुढच्या आम्हालाही बदला. त्यांनाच विजयी करा. मी भाजप-काँग्रेसला हरवण्यासाठी आलो नाही, गुजरात जिंकण्यासाठी आलो आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App