वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बुधवारी (18 ऑक्टोबर) दिल्लीच्या साकेत न्यायालयाने पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात 5 आरोपींना दोषी ठरवले आहे. त्यांना 26 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पाचही आरोपींवर मकोका लावण्यात आला.5 Accused Convicted in Murder of Journalist Saumya Viswanathan; Sentencing hearing on October 26
रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलजीत मलिक यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे, तर पाचवा आरोपी अजय सेठी याला आयपीसी कलम 411 (अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता मिळवणे) दोषी ठरवण्यात आले आहे.
पोलिसांचा दावा- हत्येमागे दरोड्याचा हेतू
या हत्येमागे दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हत्येप्रकरणी दोषी ठरलेले पाच जण मार्च 2009 पासून कोठडीत आहेत. या निकालानंतर सौम्याच्या आईने सांगितले की, आम्ही दोषींना जन्मठेपेची मागणी करतो, आम्हाला जसा त्रास सहन करावा लागला तसाच त्रास त्यांनीही भोगावा.
कार्यालयातून घरी परतत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या
25 वर्षीय सौम्या विश्वनाथन हेडलाइन्स टुडेची पत्रकार होती. 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे 3.30 वाजता वसंत विहार, दिल्ली येथे त्यांची हत्या करण्यात आली. ती आपल्या कारने ऑफिसमधून घरी परतत होती.
हत्यार सापडल्याने खुनाचा खुलासा
जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त केल्याने सौम्याच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. 2017 मध्ये, ट्रायल कोर्टाने रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना जिगिषा घोष खून प्रकरणात फाशी आणि बलजीत मलिक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मात्र, उच्च न्यायालयाने रवी कपूर आणि अमित शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती आणि जिगीशा हत्याकांडातील बलजीत मलिकची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App