वृत्तसंस्था
श्रीनगर : पाकिस्तान सीमेवर 250 ते 300 दहशतवादी लॉन्चपॅडवर आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्तचरांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न केला तर सैनिकांकडून हाणून पाडला जाईल. 250 to 300 terrorists preparing to infiltrate India; Alert in Jammu and Kashmir after information from intelligence sources
बीएसएफचे आयजी अशोक यादव यांनी पुलवामा येथे सांगितले की, दहशतवादी कारवाया पाहता आम्ही (बीएसएफ) आणि लष्कर संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून आहोत आणि सतर्क आहोत. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दल आणि काश्मीरमधील जनता यांच्यातील बॉन्डिंग वाढले आहेत. जनतेने सहकार्य केले तर विकासाची कामे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकू.
महिनाभरापूर्वी 6 दहशतवादी ठार
24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमकी झाल्या, ज्यामध्ये 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलगाममध्ये सुरू झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमक 23 नोव्हेंबरला 34 तासांनंतर संपली. यामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले.
कॅप्टन शुभम, कॅप्टन एमव्ही प्रांजिल, हवालदार माजिद, पॅराट्रूपर सचिन लाऊर आणि नाईक संजय बिश्त यांचा मृत्यू झाला. कारी असे ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव आहे. संरक्षण पीआरओच्या म्हणण्यानुसार, कारी हा पाकिस्तानी नागरिक होता. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले. तर दुसऱ्या दहशतवाद्याची माहिती समोर आलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App