प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून काल 15 ऑगस्ट रोजी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आणि आज बुधवारी मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. 1 lakh loan to artisans under Vishwakarma Yojana
विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
विश्वकर्मा योजनेशिवाय पीएम ई-बस सेवेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर 57,613 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. याअंतर्गत देशभरात सुमारे 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 57,613 कोटींपैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. या योजनेत 300000 आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App