रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर मुसळधार पावसांचे पुन्हा संकट; पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती देण्यात आली आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. Yellow alert in six dist. of Maharashtra

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने काही जिल्ह्यात हाहाकार उडाला. नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.


पूरग्रस्त जिल्हे रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Yellow alert in six dist. of Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात