राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे, गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.” त्यांच्या या ट्वीटवर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. Nawab Malik said, Government guests will come to our house today Or tomorrow, Gandhi fought against White, we will fight against thieves
वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे, गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.” त्यांच्या या ट्वीटवर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही मुंबई उच्च न्यायालयासमोर यापुढे समीर वानखेडेविरोधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वक्तव्य करणार नसल्याचे मान्य केले.
नवाब मलिक यांनी जाणूनबुजून विरोधात जाऊन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टिप्पणी केली, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीरच्या कुटुंबाविरुद्ध वक्तव्ये करणार नाही, असे न्यायालयाला पटवून दिले होते. यानंतरही त्यांनी वक्तव्य केले. यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App