वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर भारतात मार्च हीटचा तडाखा बसला असून पाऱ्याने प्रथमच तीन दिवसात चाळिशी ओलांडली आहे. March heat wave in North India: Mercury Forty crossed for the first time in three days
प्दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम यूपी, पूर्व राजस्थानची काही शहरे प्रचंड उष्णतेचा सामना करत आहेत. या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात उन्हाचा प्रचंड त्रास जनतेला होत आहे. मार्च महिन्यात सलग तीन दिवस देशात मैदानी राज्यातील शहरांमध्ये तापमानाने चाळिशीचा पल्ला पार केला आहे.
बुधवारी देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ४४.२ तर अकोल्यात ४३.२ सेल्सियसची नोंद झाली. दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश व पूर्व राजस्थानातील बहुतांश शहरांत सलग तिसऱ्या दिवशी ४० सेल्सियस तापमान होते. सर्वसाधारणपणे पश्चिम राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगण, आंध्र व कर्नाटकातील काही शहरांमध्येपारा चाळिशी ओलांडतो. एवढेच नव्हे तर शेवटच्या दोन आठवड्यांत तीन दिवस तापमान ४० सेल्सियस नोंदले गेले.
१५ सर्वाधिक तप्त शहरांत ४ भारतातील
– चंद्रपूर (महाराष्ट्र) ४४.२ अंश
– अकोला (महाराष्ट्र) ४३.३ अंश
– चुरू (राजस्थान) ४३ अंश
– पिलानी (राजस्थान) ४२.८ अंश ( ३० मार्च )
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App