अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानासाठी सोडण्यास ईडीचा कोर्टात विरोध Mahavikas front’s unity net, but a decline in two votes
प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणूकीत १० जून शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांची एकत्रित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडेंट येथे बैठक झाली आहे. अशा प्रकारे एकेक मताला महत्व प्राप्त झाले असताना महाविकास आघाडीला दोन मतांना वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ईडीने केला विरोध
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे याकरता मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्याकरता एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी विनंती केली आहे. त्यावर बुधवारी, ८ जून २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी मलिक आणि देशमुख यांना एक दिवसाचा जामीन मिळणार का, यावर फैसला होणार आहे. मात्र त्याआधीच ईडीने याला विरोध केला आहे. पीएमएलए विशेष न्यायालयात ईडीने तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे जर ईडीने केलेला विरोध न्यायालयाने ग्राह्य धरला तर मात्र महाविकास आघाडीला २ मतांपासून वंचित राहावे लागणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असून अन्य ७ आमदारांचा पाठिंबा आहे. अशी एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. तर भाजपलाही १३ मतांची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App