विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहेत. जोपर्यंत हे आरक्षण पुन्हा दिले जात नाहीत, तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भाजपने केली आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी एकमत व्यक्त केले आहे. यामुळे राज्यातील राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह, नाशिक, औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेऊ नये, अशी सर्वच स्तरांतून मागणी होत आहे. याच कारणामुळे नियोजित महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचना
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App