विशेष प्रतिनिधी
मुबंई : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. डिसेंबरमध्ये जेव्हा सर्व बॉलीवूड मालदीवमध्ये सुट्ट्यासाठी गेले होते. त्यावेळी समीर वानखेडे देखील मालदीवमध्ये जाऊन वसुलीचे काम करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik
नुकताच नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आपल्या धमकी देणारे फोन असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार नवाब मलिक यांनी याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे असं सांगण्यात येते
Nawab Malik vs Fadanvis:नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …
या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरमध्ये मी दुबईला गेलो नव्हतो किंवा कुठेही वसुली करण्यासाठी गेलो नव्हतो असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालदीवला आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गेलो होतो आणि ऑफिशियली सुट्टी घेऊन मी गेलो होतो. याची चौकशी केली तर तुम्हाला सर्व प्रकरण कळेल. असे देखील समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App