विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रात नवनियुक्त भाजपच्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हादरले आहे, असे भाजपचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.Due to BJP’s Jana Aashirwad Yatra Thackeray – Pawar government shaken
पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले. नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भरती पवार आणि कपिल पाटील यांनी मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर जनाआशिर्वाद यात्रा काढल्या. त्याचे जनतेने मोठे स्वागत केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गंभीर नाही. त्यांचे प्रश्न एकून घेणारे कोणीच नाही, असा आरोप केला.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, पत्रकारांना १५ राज्यांनी फ्रँटलाईन वर्कर घोषित केले असताना पुरोगामी महाराष्ट्र असल्याचा डंका पिटणारे सरकार मागे कसे राहिले ? हेच मला कळत नाही. शिवस्मारकाचा प्रश्न दोन वर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App