Corona updates : कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन यामुळे राज्य सरकार चिंतित आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतची शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या जोडीला नाइट कर्फ्यूही लागू आहे. तथापि, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढच पाहायला मिळत आहे. आजच्या अपडेटनुसार एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत 8082 रुग्णांची नोंद झाली आहे. Corona updates Total 8082 New Corona patients Found in Mumbai in last 24 Hours
वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन यामुळे राज्य सरकार चिंतित आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतची शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या जोडीला नाइट कर्फ्यूही लागू आहे. तथापि, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढच पाहायला मिळत आहे. आजच्या अपडेटनुसार एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत 8082 रुग्णांची नोंद झाली आहे.
#CoronavirusUpdates३ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण- ८०८२ २४ तासात बरे झालेले रुग्ण-६२२ बरे झालेले एकूण रुग्ण-७५१३५८बरे झालेल्या रुग्णांचा दर-९३% एकूण सक्रिय रुग्ण- ३७२७४ दुप्पटीचा दर-१३८ दिवसकोविड वाढीचा दर (२७ डिसेंबर-२ जानेवारी)-०.५०%#NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 3, 2022
#CoronavirusUpdates३ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- ८०८२
२४ तासात बरे झालेले रुग्ण-६२२
बरे झालेले एकूण रुग्ण-७५१३५८बरे झालेल्या रुग्णांचा दर-९३%
एकूण सक्रिय रुग्ण- ३७२७४
दुप्पटीचा दर-१३८ दिवसकोविड वाढीचा दर (२७ डिसेंबर-२ जानेवारी)-०.५०%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 3, 2022
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण आज झपाट्याने वाढत आहेत. मागच्या 24 तासांत येथे 8082 रुग्ण नव्याने आढळले असून यामुहे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 37274 वर गेली आहे. दुसरीकडे, याच काळात 622 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर 138 दिवसांवर आहे, तर कोरोना वाढीचा दर 0.50 टक्के नोंदवण्यात आला आहे.
ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये भारतात तिसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. अशा वेळी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा त्रास वाढवू शकतो. केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा इशाराही भारतासाठी मोठा धोका आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनची एकूण 1700 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 639 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 510, त्यानंतर दिल्लीत 351, केरळमध्ये 156, गुजरातमध्ये 136 तर तामिळनाडूमध्ये 121 प्रकरणे नोंदवली गेली.
Corona updates Total 8082 New Corona patients Found in Mumbai in last 24 Hours
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App