या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधींना ‘’सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे?’’, अशी बदनामीकारक टिपण्णी केल्याबद्दल सुरत कोर्टाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि ३० दिवसांसाठी जामीनही दिला गेला. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसची जोरदार टीका, टिप्प्णी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकारपरिषद घेत राहुल गांधी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. BJP will protest all over Maharashtra against Rahul Gandhi Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले, ‘’आज राहुल गांधींविरोधात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोन वर्ष शिक्षेचं प्रावधान केलं गेलं. खरंतर आज संपूर्ण ओबीसी समाज आणि विशेष करून देशातील ओबीसी समाजामधील मोठा तेली समाजातून देशभर, राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींनी मोदींना चोर म्हणून जी टिप्पणी केली होती, आर्वाच्य भाषेत जी टिप्प्णी जेव्हा झाली होती, तेव्हाही आणि खरंतर आता न्यायालयाने जी शिक्षा दिली. या शिक्षेपेक्षाही समजाचा जो मोठा अपमान राहुल गांधींनी केला, तो न्यायालयाच्या निर्णयाने आपल्या समोर आला आहे.’’
मोदी आडनावाला चोर ठरवणाऱ्या राहुल गांधींना सुरत कोर्टाची शिक्षा; राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण; काँग्रेसचे भाजप विरुद्ध आंदोलन
याचबरोबर ‘’ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करणारे राहुल गांधी यांच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा आंदोलन करणार आहे. खरंतर ते इतके निर्लज्ज झाले आहेत की न्यायालायने निकाल दिल्यानंतर, न्यायालय हे दबावाखाली काम करतं अशा अनेक काँग्रेस नेत्यांनी टिप्प्णी केल्या आहेत.’’ असं बावनकुळे म्हणाले.
| LIVE |📍मुंबई | माध्यमांशी संवाद https://t.co/QJYsKmCtnW — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 23, 2023
| LIVE |📍मुंबई | माध्यमांशी संवाद https://t.co/QJYsKmCtnW
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 23, 2023
याशिवाय ‘’पंतप्रधान मोदींना, ओबीसी समाजातीली एका मोठ्या नेत्याला भरसभेत जातीवाचक शिवीगाळ करायची, मागासवर्गीयांचा अपमान करायचा आणि जेव्हा त्यांच्याविरोधात निकाल येतो तेव्हा न्यायालयाचाही अपमान करायचा. जेव्हा काँग्रेसच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ती लोकशाही असते आणि जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा हुकमाशाही होते. तेव्हा सरकारचं दडपण असतं. त्यामुळे या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे.’’ असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App