
उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्योजकांना केल्या. When workers come from other states, keep them in isolation, instructions to Chief Minister Uddhav Thackeray’s industries
प्रतिनिधी
मुंबई : उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्योजकांना केल्या.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्योजकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत.
अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. साप भी मरे और लाठी भी ना तुटे, असे आपल्याला वागावे लागेल.
ठाकरे म्हणाले, युकेतील विषाणू सारखा किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत. पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भीती होती. ऑ क्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले.
बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग पसरणार नाही हे पहा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केले आहे.
When workers come from other states, keep them in isolation, instructions to Chief Minister Uddhav Thackeray’s industries
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाषेवर भेदभाव थांबवा’, दिल्लीच्या रुग्णालयात परिचारिकांना मल्याळम बोलण्यावर बंदीच्या आदेशावर राहुल गांधींचा संताप
- HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन
- ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप
- बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे