विेशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना महिन्याला सरकारकडून पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. विधान भवनात झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही घोषणा केली. Warkari gets five thousand per month
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले काळाच्या ओघात संतपीठ ही संकल्पना बाजूला गेली होती; पण वारकरी साहित्य परिषदेच्या रूपाने या विषयाला बळ मिळाले आहे.
महाविकास आघाडी सरकार याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल. यांनी दिले. वारकऱ्यांना मानधन देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वारकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील. बैठकीला वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App