अमरावतीत झालेल्या जातीय दंगलींनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि संदेश पाठविण्याऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. The entire market will be open in Amravati from 7 am to 9 pm today
विशेष प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड सुद्धा झाली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे.संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे.
आज पासून ( 23 नोव्हेंबर ) सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदीत सूट देण्यात आली आहे तर रात्री 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. असा पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आदेश दिला आहे.
अमरावतीत झालेल्या जातीय दंगलींनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि संदेश पाठविण्याऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल झाले असून एकूण ३१२ जणांना अटक करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App