वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मृतांचा आकडा वाढत असून लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आहेत. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांनी तडफडून प्राण गमवला आहे. The challenge of oxygen supply in the state;Many corona patients died of suffocation
कोरोना रुग्णांपैकी पंधरा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनच उत्पादन अपुरं पडत आहे. कोरोना आपत्कालीन परिस्थितील वर्ष पूर्ण झाले. मात्र, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या राज्यात दररोज 1 हजार 237 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. 31कंपन्या ऑक्सिजनच उत्पादन करतात. त्यातील 7 ते 8 मुख्य उत्पादक कंपन्या असून ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी फक्त 71 रिफिरल आहे. राज्यात छत्तीसगढ आणि गुजरातमधून ऑक्सिजनची मागणी केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App