एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामाही प्रसिद्ध केला आहे. यावर समीर वानखेडे यांच्या वडिलांचे वक्तव्य आले आहे. sameer wankhede father said nikahnama is true but we are all hindu, nawab malik allegations On NCB Zonal Director
वृत्तसंस्था
मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामाही प्रसिद्ध केला आहे. यावर समीर वानखेडे यांच्या वडिलांचे वक्तव्य आले आहे.
समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव यांनीही निकाहनामा खरा आहे, पण आम्ही हिंदू आहोत, अशी कबुली दिली आहे. ‘आज तक’शी बोलताना समीर वानखेडे यांचे वडील म्हणाले, निकाहनामा खरा आहे, पण आम्ही हिंदू आहोत. मी, माझा मुलगा आणि मुलगी हे छोटे कुटुंब असून आम्ही सर्व हिंदू आहोत. माझी पत्नी मुस्लिम होती.”
समीर वानखेडे यांच्या वडिलांना निकाहनामावर दाऊदच्या नावाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘हे एक मोठे लग्न होते, मला उर्दू समजत नाही, माझ्या पत्नीने असे लिहिले असावे. माझे नाव ज्ञानदेव आहे, दाऊद नाही. कदाचित माझ्या पत्नीने लग्नासाठी म्हणून दाऊद लिहिले असावे. मी काहीही लपवले नाही. मी जन्माने हिंदू आहे.”
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा प्रसिद्ध करताना दावा केला आहे की, ‘समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचे गुरुवारी, 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झाले. मेहेरची रक्कम 33000 हजार होती. साक्षी क्रमांक 2 अजीज खान हा समीर वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचा पती आहे.
नवाब मलिक यांनी निकाहनामा जारी केला, त्यानंतर निकाह पढणाऱ्या काझींचे वक्तव्यही समोर आले. काझी मुजम्मिल अहमद यांनी सांगितले आहे की, हा निकाहनामा अगदी बरोबर आहे आणि त्यांनीच हा निकाह लावला होता.
त्यावेळी समीर, शबाना, वडील सर्व मुस्लिम होते, समीर हिंदू असता तर लग्न झाले नसते, कारण शरियतनुसार असे होऊ शकत नाही, असे काझी यांनी म्हटले आहे. काझी म्हणाले की, समीर आज काहीही बोलत असेल, पण तो तेव्हा मुस्लिम होता.
नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर हेच आरोप करून त्याचा जात पुरावा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. यासोबतच समीर वानखेडे यांनी चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवून दलितांचा हक्क मारला असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App