विशेष प्रतिनिधी
मुंबई – “मला काल एकाने विनोद सांगितला, की ‘सध्याची उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?”, असे वाटतेय, अशी खोचक राजकीय टिपण्णी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी काल झालेल्या झूम मिटिंगनंतर त्यातील मुद्द्यांचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी लॉकडाऊनपासून अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांपर्यंत सर्व प्रश्नांवर भूमिका मांडली. raj thackeray targets uddhav thackeray over lockdown issue as well as takes him to stride
राज ठाकरे म्हणाले, की मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटके ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका. आणि परमवीर सिंग यांना १०० कोटी वसूलीच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवले गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचे टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोप होणेच लांच्छनास्पद आहे, अशी टिपण्णी राज यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले, की मला काल एकाने विनोद सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?,
राज ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे असे –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App