विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमायक्रॉन या विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन इलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका तहकूब करण्याबाबत विचार करावा असे पंतप्रधान मोदींना म्हटले आहे. त्याचप्रमाणे निवडणूक रॅली, सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. असे देखील सांगण्यात आले. निवडणुकांचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा अशी सूचना देखील दिलेली आहे.Omaicron: Will elections in Maharashtra go awry?
या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत चर्चेत हे विधान करत महाराष्ट्रातील निवडणुकादेखील पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. राज्यात मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकेसह 22 महानगरपालिकांची निवडणूक येणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
जर उत्तर प्रदेश मधील निवडणुका पुढे गेल्या तर महाराष्ट्र मधील निवडणूक आयोगाला तसा निर्णय घ्यावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App