Toll Policy : आता एक्सप्रेस वेवर जेवढी चालेल गाडी, तेवढाच आकारला जाणार टोल?

मोदी सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणण्याच्या विचारात  (Toll Policy)

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : जर तुम्ही दुर्तगती महामार्गावर गाडीने जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत, तुमची गाडी किंवा वाहन एक्सप्रेस वेवर जितकी चालेल तेवढाच टोल आकारला जाणार आहे. Toll Policy

सूत्रांच्या माहितीनुसार, देशात लवकरच एक नवीन टोल धोरण येणार आहे. प्रत्येक टोल बूथवर फास्टॅग आणि कॅमेरे बसवले जातील. नवीन टोल धोरणानुसार, वाहन जितके धावेल तितकाच टोल कर आकारला जाईल. जर फास्टॅग काम करत नसेल तर कॅमेऱ्यांमधील नंबर प्लेट वाचून पैसे थेट खात्यातून कापले जातील. Toll Policy



सूत्रांचे म्हणणे आहे की, हे नवीन टोल धोरण सध्याच्या व्यवस्थेपेक्षा अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर असेल. यामुळे लोकांना टोल प्लाझावर होणारा दैनंदिन त्रास आणि लांब रांगांपासून मुक्तता मिळेल.

या नवीन प्रणालीमध्ये GPS (सॅटेलाइट नेव्हिगेशन) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ते तुमच्या कारच्या मार्गाचा मागोवा घेईल आणि त्या आधारावर टोल शुल्क मोजले जाईल. या धोरणाचा उद्देश टोल प्लाझा काढून टाकणे आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागू नये आणि प्रवास जलद आणि सोपा होईल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की एका कारला प्रत्येक १०० किमीसाठी सुमारे ५० रुपये द्यावे लागतील.

Modi government considering bringing new toll policy soon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात