विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी “एक है तो सेफ है”, असा राजकीय नारा देत पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणार असल्याचा निर्वाळा दिला.
भाजप विधिमंडळ पक्षाने देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड केल्यानंतर फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले तिथून ते तिघेही एकाच गाडीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटायला राजभावनावर गेले एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांपुढे सादर केला अजित पवारांनी तशाच आशयाचे पत्र राज्यपालांना दिले महायुतीतील सर्व घटक पक्षांनी आपापल्या पाठिंब्याची पत्रे राज्यपालांना सादर केली. राज्यपालांनी उद्या सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करण्यास मान्यता दिली.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM-designate Devendra Fadnavis says, "The swearing-in ceremony of the new government will be held tomorrow at 5.30 pm in the presence of Prime Minister Narendra Modi… We will decide by evening who all will take oath tomorrow. Yesterday I met Eknath… pic.twitter.com/jmn9c6JJEx — ANI (@ANI) December 4, 2024
#WATCH | Mumbai: Maharashtra CM-designate Devendra Fadnavis says, "The swearing-in ceremony of the new government will be held tomorrow at 5.30 pm in the presence of Prime Minister Narendra Modi… We will decide by evening who all will take oath tomorrow. Yesterday I met Eknath… pic.twitter.com/jmn9c6JJEx
— ANI (@ANI) December 4, 2024
त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजभवनातच संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब आहे. आम्ही सगळे एकत्र बसून प्रत्येक निर्णय घेतो आणि इथून पुढेही घेऊ, असा निर्वाळा दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होतील, असा आशावाद व्यक्त केला, त्यावर आपण संध्याकाळपर्यंत निर्णय देऊ, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 9 दिवसांनी महायुतीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करताना राजकीय दृष्ट्या “एक है तो सेफ है”, हे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना जी राजकीय अडचण निर्माण झाली होती, ती देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून दूर झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App