विशेष प्रतिनिधी
जळगाव – कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये घट होत आहे त्यामुळे केळी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.Jalgaon banana crop due to Karpa disease Losses, farmers became distraught
जिल्ह्यातील तापी पूर्णा पट्टा हा केळी उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखला जातो परंतु या वर्षी कडाक्याची थंडी या थंडीमुळे केळी उत्पादन क्षेत्रावर दुष्परिणाम झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव सर्व केळी पाट्यावर दिसून येत आहे
त्यामुळे एका झाडाला लागणार्या केळीच्या घडावर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे दहा ते बारा रास या एका झाडाला लागत आहे केळी उत्पादनासाठी लागणारा खर्च पाहता तोही शेतकऱ्याच्या पगारामध्ये पडत नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे
एक झाड जगण्यासाठी शेतकऱ्याला ७० ते ८० रुपये खर्च होतात. परंतु तेही शेतकऱ्याच्या पदरामध्ये आता पडत नाही सध्या प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडलेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App