Ramdas Athawale : ‘हिंदू मतदारांनी राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंवर बहिष्कार टाकावा’, रामदास आठवलेंचं विधान!

Ramdas Athawale

विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी त्यांना मतदारांनी धडा शिकवलेलाच आहे, असंही आठवले म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Ramdas Athawale केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी महाकुंभाला उपस्थित न राहून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. रामदास आठवले पुढे म्हणाले की, हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर बहिष्कार टाकावा.Ramdas Athawale

रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले, “ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण त्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात भाग घेतला नाही. महाकुंभात सहभागी न होऊन ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू असणे आणि महाकुंभात सहभागी न होणे हा हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे.

याशिवाय रामदास आठवले म्हणाले, “लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी महाकुंभात सहभागी व्हायला हवे होते. त्यांना नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात भाग घेतला नाही. मला वाटते की हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.” तसेच रामदास आठवले म्हणाले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी या नेत्यांना धडा शिकवला आहे.

२०२५ च्या महाकुंभात भारतासह जगभरातील ६६ कोटींहून अधिक लोकांनी गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. महाकुंभाची सुरुवात १३ जानेवारी २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाली होती. तर काल म्हणजेच २६ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोप झाला.

Hindu voters should boycott Rahul Gandhi and Uddhav Thackeray says Ramdas Athawale

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात