विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 100 दिवस आराखडा कार्यक्रमांतर्गत हिरव्या आणि पिवळ्या रंगातील मुद्द्यांवर विभागांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येत्या ‘1 मे’पर्यंत अपूर्ण असलेल्या लाल रंगातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून कामे पूर्ण करावीत. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर 100 दिवस आराखड्यातील घेतलेली कामे, पूर्ण झालेली कामे व अपूर्ण कामे कारणांसह ‘पब्लिक डोमेन’मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बैठकीमध्ये एकूण 22 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी 44 टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झाले आहे. तसेच 37 टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र 19 टक्के मुद्दे अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली.
अजितदादांवर चुलत्याची “कृपा”; फडणवीसांनी दाखवली आशीर्वादाची “मर्यादा”!!
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री गणेश नाईक, मंत्री दादाजी भुसे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App