विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगलीच्या रणरागिणीनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाईचे शिखर सर केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीतून २९ व ३० जाने रोजी सह्याद्री ट्रेकर्स सांगली यांच्या माध्यमातून ही मोहीम आखली होती. Everest of Maharashtra Kalsubai Peak is qunqerd by Sangli women
या मोहिमेत सांगलीतून कीर्ती सुजितकुमार काटे , तृप्ती स्वामी, स्वाती ओकारे , उर्मीली पाटील, वैशाली कवठेकर नंदाताई खराडे , बबुताई पाटील, प्रभावती भोसले, तबसुम मुजावर, सुचिता भोकरे या महिलांनी शिखरावर अतिशय अवघड व दुर्गम असणारी वाट आपल्या पायाखाली तुडवत या रगरगिनीनी मोहिमेत हिरीरीने सहमाग घेत यशस्वी रित्या घेवून १६४६ मीटर उंचीचे कळसुबाई शिखर सर केले.
या ट्रेक मध्ये सह्याद्री ट्रेकर्स सांगलीचे वैभव बंडगर, युवराज साठे , दिलीप गोसावी, अजित पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या सर्व महिलांच्या या धाडसी कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App