– भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची ही अपेक्षा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जुनी खोड अजून गेलीच नाही. त्यामुळे अजितदादांकडून निधीची आडवा आडवी होती आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगाम घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा सत्ताधारी भाजपा आमदारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात भाजपच्या अनेक आमदारांनी अजित पवारांच्या काड्या घालण्याच्या धोरणाविरुद्ध तक्रारी केल्याच होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना काढून ज्या मतदारसंघांमधून भाजपचे आमदार निवडून आले त्याच मतदारसंघांमध्ये अजित पवार पराभूत उमेदवारांना बळ देत असल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यावर तुम्ही अजित पवारांसह सगळ्या मंत्र्यांकडे रेटून पाठपुरावा करा. आपली कामे करवून घ्या. महायुतीमध्ये भाजपचे आमदार सगळ्यात जास्त आहेत. त्या संख्याबळाचा वापर करा. तुम्ही तक्रार करण्यापेक्षा अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असे काम करा, अशा सल्ला अमित शाह यांनी सगळ्या आमदारांना दिला होता.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगाम घालून निधी वाटपाचा प्रश्न भाजप आणि शिवसेना आमदारांच्या बाजूने सोडवायला पाहिजे, अशी अपेक्षा भाजपच्या आमदारांकडून व्यक्त होताना दिसत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्याला आज तोंड फोडले. ओबीसी आणि धनगर समाजाच्या वेगवेगळ्या योजनांसाठी शासकीय निधी देताना अजित पवार अडवणूक करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ते 31 मे नंतर त्यांना देणार असल्याचे पडळकर यांनी पंढरपूर मध्ये सांगितले.
सध्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या कार्यक्रमांमध्ये सगळा महाराष्ट्र आणि देश व्यस्त आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सध्या निधी वाटपाचा हा वादग्रस्त विषय नको, पण अजित पवार निधी देताना अडवणूक करतात ही बाब खरी आहे आणि म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, याकडे गोपीचंद पडळकर यांनी लक्ष वेधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App