विशेष प्रतिनिधी
अमरावती :त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणाव निर्माण झाला.अमरावतीत सलग दुसऱ्या कालही (१३ नोव्हेंबर) हिंसाचाराचा भडका उडला. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच चार दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . AMRAWATI VIOLANCE: Internet services were shut down and a four-day curfew was imposed in Amravati
सलग दुसऱ्या दिवशीही हिंसेचा भडका उडाल्यानं अमरावती प्रशासनानं सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर दूरसंचार कंपन्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इंटरनेट सेवा बंद केली.पुढील तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने शनिवारी (१३ नोव्हेंबर) कर्फ्यू (कलम १४४) लागू केला. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील चार दिवस कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याची माहिती दिली.
अमरावतीत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी शांतता समिती चीं बैठक घेण्यात आली. अमरावतीतील जनजीवन सुरळीत व्हायला पाहिजे, शांतता भंग कऱण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन यानिमित्ताने मी सर्वांना करत आहे. #AmravatiUnderControl #Amravati pic.twitter.com/fUd5Re3DOC — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 13, 2021
अमरावतीत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी शांतता समिती चीं बैठक घेण्यात आली. अमरावतीतील जनजीवन सुरळीत व्हायला पाहिजे, शांतता भंग कऱण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन यानिमित्ताने मी सर्वांना करत आहे. #AmravatiUnderControl #Amravati pic.twitter.com/fUd5Re3DOC
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 13, 2021
पालकमंत्र्यांची सर्वधर्मीय नेत्यांशी चर्चा
शनिवारीही अमरावती शहरात हिंसेचा उद्रेक झाल्यानं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहरातील तणाव निवळण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्मीय नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या बैठकीतही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व पक्षीय नेत्यांना शांतता प्रस्थापित करण्याबद्दल आवाहन केलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App