विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmi काशी विश्वनाथासह हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करून क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या आमदार अबू आझमींविरुद्ध विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर आज विधानसभेने आवाज मतदानाने अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळासाठी विधानसभेतून निलंबित केले. विधानसभेच्या आवारात पाऊल टाकण्याची त्यांना बंदी घातली. Abu Azmi
अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केल्यामुळे यांनीसर्वपक्षीय आमदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभेतला हा दबाव बघून अबू आझमींनी आपले वक्तव्य मागे घेतले होते, पण ते वक्तव्य मागे घेताना आझमींनी हेकडी कायमच ठेवल्याचे दिसून आले. औरंगजेबाला त्यांनी “औरंगजेब रहमतुल्ला आलेह” असे संबोधले. वेगवेगळ्या कम्युनिस्ट इतिहासकारांनी औरंगजेबाला “थोर” म्हणल्याचा दाखला दिला.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या कारकिर्दीत भारताचा जीडीपी 24 % होता. त्याने अनेक मंदिरे बांधली 34% हिंदू औरंगजेबाच्या बाजूने होते. भारताची सरहद्द अफगाणिस्तान पर्यंत होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाचा झगडा धार्मिक नव्हता, तर तो सत्तेसाठी होता, अशी मुक्ताफळे अबू आझमी यांनी उधळली होती.
विधानसभेत आज त्यावरूनच प्रचंड गदारोळ झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली. आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवायची मागणी केली. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी शिंदे यांचे म्हणणे उचलून धरत अबू आझमी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, मंत्री उदय सामंत, नितेश राणे यांनी देखील आझमी यांचे तुफान वाभाडे काढले. सर्व नेत्यांनी अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.
*आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होऊन आमदारकी रद्द होण्यापर्यंत पाळी येऊ शकते, याचा धोका लक्षात येताच अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावरून फिरवा फिरवी केली. औरंगजेबाविषयी रोमिला थापर आणि अन्य इतिहासकारांनी जे लिहून ठेवले आहेत तेच मी बोललो. मी कुठली नवी भूमिका मांडली नाही. पण आता माझ्या विरोधात लोकांनी काहूर उठवले आहे. सत्ताधारी त्या लोकांच्या बाजूने आहेत त्यांना महाराष्ट्रात वातावरण पेटवायचे आहे म्हणून मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशी मखलाशी अबू आझमी यांनी केली होती.
पण आज संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर सुधीर मनगंटीवार यांनी संपूर्ण पाच वर्षांसाठी अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करा, अशी मागणी केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कुठल्याच आमदाराला संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करता येत नाही, असे कारण चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, पण त्याचवेळी अबू आझमी यांच्या संदर्भात समिती नेमून तसा निर्णय घेता येईल का ते पाहू, असे आश्वासन दिले त्यानंतर विधानसभेने आवाजी मतदानाने अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App