बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते.
पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.
“लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा”, अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.
इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. मात्र, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनीच चर्चेत राहतात. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “या मंत्र्याचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने चालवलेल्या कारने उडवले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.
पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या देत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर हल्ला चढविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.
सत्तेच्या तुकड्यासाठी “पवार संस्कारितांची” तडफड; पण नको ते ऐक्य म्हणून अजितदादांच्याच दोन नेत्यांची धडपड, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मिळणारी संभाव्य संधी धूसर!!, असे राजकीय चित्र आज समोर आले.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी पळवल्याचा आरोप धुडकावून लावला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा व खोटा आहे. ज्यांना अर्थसंकल्पाची मांडणी कळत नाही तेच असे आरोप करतात. अर्थसंकल्प न कळणाऱ्यांनी माझ्याकडे यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.
कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जुनी खोड अजून गेलीच नाही. त्यामुळे अजितदादांकडून निधीची आडवा आडवी होती आहे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही, म्हणून त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी हिंगोली येथील पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे ७५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी ते एका शेतकरी व महिला मेळाव्यालाही संबोधीत करणार आहेत.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘बलरामपूर बायोयुग’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आज आपल्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर ‘बायोयुग’ हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अॅसिड) हे समाधान आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे निष्ठा, न्याय आणि धर्मपरायणतेचा अद्वितीय योग.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App