प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असते तर तेथील लोकांना योग्य किमतीत वस्तू खरेदी करता आल्या असत्या.Pakistani people also want Modi Prime Minister: candid comments given in YouTube video
व्हिडीओ बनवणाऱ्या सनाने जेव्हा त्यांना विचारले की, आजकाल एक नारा ऐकू येतोय- ‘पाकिस्तान से जिंदा भागो, चाहे भारत चले जाओ’… तेव्हा ही व्यक्ती म्हणाली- कदाचित जर फाळणी झाली नसती, तर माझा जन्म पाकिस्तानात झाला नसता. आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू आम्ही कमी किमतीत विकत घेऊ शकलो असतो आणि आमच्या मुलांना रोज रात्री खायला घालू शकलो असतो.”
An ordinary Pakistani saying from core of his heart he wants Modi ji to be the PM of Pakistan for 8 years. Not Imran Khan or Nawaz Sharif. Says, there is no comparison between India and Pakistan. Modi will straighten out things in sinking Pakistan. pic.twitter.com/7qEpZsGMBo — Vinay Sharma (@Sharma_V_inay) February 23, 2023
An ordinary Pakistani saying from core of his heart he wants Modi ji to be the PM of Pakistan for 8 years. Not Imran Khan or Nawaz Sharif. Says, there is no comparison between India and Pakistan. Modi will straighten out things in sinking Pakistan. pic.twitter.com/7qEpZsGMBo
— Vinay Sharma (@Sharma_V_inay) February 23, 2023
पाकचे नागरिक म्हणाले- इस्लामिक देशात इस्लामची अंमलबजावणी होऊ शकली नाही
व्हिडिओमध्ये ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, आपण भारतात असतो तर टोमॅटो 20 रुपये किलो, चिकन आणि पेट्रोल 150 रुपये किलोने मिळाले असते. आपल्याला इस्लामिक देश मिळाला, पण आपण येथे इस्लामची अंमलबजावणी करू शकलो नाही, हीसुद्धा शरमेची बाब आहे.
भारतातील लोक मोदींचा आदर करतात
ही व्यक्ती म्हणाली, ‘मोदी आमच्यापेक्षा चांगले आहेत. भारतातील लोक त्यांचा आदर करतात, त्यांना फॉलो करतात. आपल्याकडे नरेंद्र मोदी असते तर आपल्याला नवाझ शरीफ, बेनझीर किंवा इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासणार नाही. आपल्याला फक्त पंतप्रधान मोदींची गरज आहे. केवळ तेच या देशातील दुष्ट घटकांना सामोरे जाऊ शकतात.
ते पुढे म्हणाले, ‘भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, पण आपण कुठेही पोहोचू शकलो नाही. म्हणूनच मी आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जगण्यास तयार आहे. मोदी हे महान व्यक्तिमत्व आहेत, ते वाईट नाहीत. भारतीय लोकांना टोमॅटो आणि चिकन रास्त भावात मिळत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना रात्रीचे जेवण देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही ज्या देशात जन्माला आला त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटू लागते.’
शेवटी ही व्यक्ती म्हणाली, ‘मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला मोदी द्या आणि त्यांना आमच्या देशाची सत्ता द्या. पाकिस्तानने भारताशी तुलना करणे थांबवावे, कारण दोन्ही देशांची तुलना होऊ शकत नाही.”
पाकिस्तानी जनतेची मागणी- इम्रान, शाहबाज नको, मोदीच हवेत
असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी तरुण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. ते म्हणतात की आम्हाला इम्रान, शाहबाज नको, आम्हाला पीएम मोदींसारखा पंतप्रधान हवा आहे. आम्ही भारतात सामील झालो तर आमचीही स्थिती सुधारेल.
खरे तर पाकिस्तानातील जनता गरिबी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने त्रस्त आहे. अशा स्थितीत तिथले लोक भारताकडे तळमळीने पाहू लागले आहेत. लोक म्हणतात की, 1947 मध्ये दोन देशांना ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. एक नवीन उंचीवर आहे आणि दुसरा आपल्या जगण्यासाठी भीक मागत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App