अजित दोवाल यांची नवी कूटनिती, भारत करणार तालिबान्यांशीही बोलणी


विशेष प्रतिनिधी

काबूल : अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तयार होणाऱ्या अफगाणिस्तानच्या नव्या रचनेत तालिबान्यांचे महत्त्व लक्षात घेता भारताने त्यांच्याशी बोलणी करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. .India will talk with Taliban

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सल्ल्यानेच भारताचे प्रतिनिधी तालिबान्यांना भेटल्याचे बोलले जात आहे. सध्या तालिबानवर कोणत्याही प्रकारची बंधने नसल्याने भारताने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत अफगाणिस्तान सरकारशी वाटाघाटी करत असला तरीसुद्धा परिस्थिती बदलली तर तालिबान्यांशी देखील वाटाघाटी करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.



अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेमध्ये कतारचे नेतृत्व सक्रिय असल्याने भारताने त्यांच्याशी बोलणीसाठी पुढाकार घेतला आहे. कतारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत देखील भारताने चर्चा केल्याचे समजते.

सध्या तालिबान हा अफगाणिस्तानातील महत्त्वाचा घटक असून भविष्यात त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. अफगाणिस्तानातील तिढ्यावर शांततेच्या मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

India will talk with Taliban

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात