मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!, हे राजकीय वास्तव देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
नाशिक : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित अशी ठाकरे बंधूंची युती आज जाहीर झाली, पण दोघांनीही जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला. युती जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघून राज […]
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.
एपिस्टाईन फाईल मधून जे धक्कादायक खुलासे झाले, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान बनायची संधी आहे, असे मी म्हटले होते. पण ते 19 डिसेंबरलाच होईल, असे मी म्हटले नव्हते. शिवाय जे पंतप्रधान होतील, ते नागपूरातले असतील. बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोचले. पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांनी शरद पवारांच्या जुन्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.
पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
काँग्रेस हा विषय नक्कीच संपलेला आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की, कुठेही कटुता न येता मुंबई मनपा निवडणूक लढू, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. जागावाटपाची आमची टीम आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी जे आयुष्यभर पुढचे मागचे खालचे वरचे राजकारण केले, त्याची फलश्रुती पवारांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यांमध्येच दिसून आली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट झाली, तर पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना काँग्रेसची गरज निर्माण झाली.
अजित पवार पुण्यात चक्क महाविकास आघाडी बरोबर जाणार. पवार काका – पुतणे काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढविणार, अशा बातम्या देऊन मराठी माध्यमांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय उत्सुकता वाढवून ठेवली.
शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा अचानक पुळका आला. पण त्यांना स्वतःच्याच पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!, अशी राजकीय परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्भवली.
मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नसून आशियातील सर्वात श्रीमंत सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ठरणार आहे. यावेळच्या रणधुमाळीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:
नगरपालिका मधल्या विजयानंतर न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला. त्यांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अनेक मेळावे घ्यायला सुरुवात केली असून ठाणे शहरामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ओबीसी समुदायाची प्रातिनिधिक बैठक घेतली. त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेतले पण त्याचवेळी महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते पत्रकार परिषदा घेण्यात किंवा पत्रकारांना बाईट देण्यात मग्न राहिले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या आणि छगन भुजबळांच्या राष्ट्रवादीची फरफट झाल्याचे चित्र नाशिक मध्ये बघायला मिळाले. भाजपने महायुतीत घ्यावे म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज धडपड करून पाहिली, पण त्यात त्यांना यश आले नाही.
महायुतीमध्ये भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय ठेवायचे प्रयत्न चालवलेत खरे, पण यामुळेच ते घसरून पडणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार??, असा सवाल तयार झालाय.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीच्या घोषणेसाठी मुहूर्त काढलेला नाही, पण हा एक नवीन प्रयोग असल्याकारणाने याची मोठ्या जल्लोषात वाजत गाजतया घोषणा होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता, राज्यातील एकूण राजकीय दिशादर्शक ठरले आहेत.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर कुणी कुठे बाजी मारली, याची वर्णने करताना मराठी माध्यमांनी पुणे जिल्ह्यात अजितदादांचा जलवा 17 पैकी 10 नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा!!, असे वर्णन केले.
महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये जे मोठे यश मिळवले, 54 नगराध्यक्ष निवडून आणले
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. पण ती साधी धोबीपछाड नव्हे, तर आकड्यांच्या हिशेबात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा सुपडा साफ केला.
शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले.
दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र, तर अन्य२८ महापालिकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पासून काँग्रेसने फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात आजही कायम राहिले.
शालिनीताई पाटील वयाच्या 94 व्या वर्षी कालवश झाल्या. काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या. शालिनीताईंनी आपल्या दीर्घायुष्यात अनेक राजकीय चढ-उतार बघितले. त्यात त्यांनी कधी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर कधी साक्षी भावाने सहभाग नोंदविला. त्या जीवनाच्या प्रत्येक काळात सक्रिय राहिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीन करण्याची वेळ आली, ती सुद्धा अमित शहांच्या परवानगीने!! अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांवर आज ओढवली.
संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने अनेक बिले मांडली आणि ती पास करून घेतली तरीसुद्धा काँग्रेसच्या दृष्टीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वेगळीच फलश्रुती झाली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App