TVK मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!, हे सगळे आज सकाळी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये घडले.
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.
पश्चिम बंगाल मध्ये आज शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या समारंभात एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर काम केलेल्या वयोवृद्ध नेते माखनलाल सरकार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांची आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने निवड केली. ममता राजवटीतले सगळे गदळ दूर करण्याची जबाबदारी भाजपने जुन्या ममता शिष्यावर सोपविली.
तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!
मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!, अशीच घडामोड जय पवारांच्या एका वक्तव्यामुळे घडली.
पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!, हे राजकीय वास्तव कालच जय पवारच्या वक्तव्यानंतर समोर आले.
ग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!, असंच म्हणायची वेळ जय पवार यांच्या आजच्या वक्तव्याने आली.
दीदी, आप हारी नही!!, असे म्हणत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार केला
थलपती विजय हा अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळेच पक्ष उठवतायेत फायदा; तामिळनाडू सरकार स्थापनेत अडथळा!!, हेच राजकीय चित्र आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी समोर आले.
नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात TCS कॉर्पोरेट जिहाद आणि अशोक खरात प्रकरणांसंदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजयाताई रहाटकर यांना दोन्ही प्रकरणांच्या चौकशी आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. विजयाताई रहाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना परिणामकारक चौकशी, तपास आणि कारवाई संदर्भात निर्देश दिले.
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभवानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यात अभूतपूर्व घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसवर माओवादी मुस्लिम लीगी विचारसरणी स्वीकारल्याचा आरोप केला. पण तो आरोप आता केवळ राजकीय न राहता त्याला प्रत्यक्ष आकडेवारीची जोड मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालामधून उघड झाले.
पश्चिम बंगालसारख्या परंपरेने डाव्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या भक्कम बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा केवळ एक अनपेक्षित राजकीय निकाल नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.
गाली धोतर नेसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी विजय उत्सवात मग्न होते, त्याचवेळी राहुल गांधींनी “शांतपणे”दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव केला.
गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!, असेच आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे वर्णन करावे लागेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ही केवळ एका राज्याची सत्ता बदलणारी घटना नाही, तर ती भारतीय राजकारणाच्या व्यापक प्रवाहात मोठा बदल घडवणारी ठरू शकते.
तामिळनाडूच्या राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!, हेच राजकीय चित्र तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर समोर आले.
हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App