उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर 50 % टेरिफ लादायची दमबाजी; पण अमेरिकन दूतावासाकडून भारताची मनधरणी!!
चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय प्रवास झालेला दिसतोय. तो “अत्यंत वेगवान” आहे. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढा वेगवान राजकीय प्रवास केलेला राष्ट्राध्यक्ष सापडणे कठीण आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही.
ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून थेट मुंबई गाठायचा बेत केलेल्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातले फडणवीस सरकार उलथवण्याची भाषा केली.
एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला.
आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??
हातात लाल संविधान घेऊन आणि मुखात लोहिया + मधू लिमये यांच्या गोष्टी सांगत INDI आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी करायची असल्याचा दावा केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद नावाचा उपक्रम हाती घेऊन त्याचा दुसरा उपक्रम आज पासून दोन दिवस मुंबईत आयोजित केला.
शरद पवारांचा INDI उमेदवाराला पाठिंबा; पण त्यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, असे “पवार बुद्धीचे” तिरके राजकारण आज एकाच दिवशी घडले.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना “चोर” शब्दाचे एवढे आकर्षण का आहे??, नेमकं रहस्य काय आहे??, असे सवाल काँग्रेसच्या नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांमधल्या वर्तणुकीतून आणि राजकीय वक्तव्यातून समोर आलेत.
सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.
बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयके लोकसभेत मांडली, ज्याद्वारे गेंड्यांची कातडी सोलण्याची त्यांनी सोय केली. पण काँग्रेसची प्रवृत्तीच्या वरिष्ठ वकिलांना ते खटकल्याने त्यांनी एखाद्या कॉन्स्टेबलही आता सरकार बदलू शकेल
गेंड्यांची कातडी सोलणारी विधेयके!!, एवढे छोटे शीर्षक वाचून हा काय आणि कसला प्रकार आहे??, अशी शंका मनात उत्पन्न होईल आणि ती गैरही नाही.
मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले
0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!
ही पहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना करणाऱ्या निवडणुकीत उभा केलंया!!, असं म्हणायची वेळ INDI आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीवरून आली.
राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!, असे त्यांच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडले.सावरकर अवमान प्रकरणात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज राहुल गांधींना किंवा त्यांच्या टीमला माहिती न देताच परस्पर पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यामुळे राहुल गांधींची पुरती गोची झाली. सगळीकडे बातम्या आल्यानंतर तो अर्ज मागे घेण्याची वेळ वकिलावर आली.
लढायला अण्णा आणि निवृत्त न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!, असली तिरपागडी आणि पळपुटी राजकीय रणनीती INDI alliance मधल्या नेत्यांनी आज समोर आणली. मतदान चोरीच्या विरोधात अण्णांना लढायला सांगा
जगातली 6 मोठी युद्धे थांबवल्याच्या बाता मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सल्लागाराने भारताला अमेरिकेशी करायच्या वर्तणुकीबाबत दमबाजी केली
ट्रम्प तात्यांची बडबड आणि रशिया – युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडींना उत आला असताना आज एकाच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःहून फोन कॉल केला आणि त्याच दिवशी चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. या दोन महत्त्वाच्या घटनांचा राजकीय योगायोग राजधानीत घडल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App