राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के आहे; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!!, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतले चित्र स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार म्हणून उभे राहणार की कुठला वेगळाच मार्ग अवलंबणार??, यावर दाट संशय निर्माण झाला.
शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!, अशी राजकीय घडामोड आज घडली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी स्वतःच्याच नावाचा “वजीर” पुढे सरकवला
एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टाकलेला डाव आणि विलीनीकरणाची खेळी याचा दबाव याचा उलटाच परिणाम झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जरा जास्तच जवळीक वाढली. याचा प्रत्यय आजच्या राजकीय घडामोडीतून आला.
अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!, हेच राजकीय चित्र आता कायमचे टिकून राहण्याची शक्यता आहे.
अंजली दमानियांचा आरोप; खारगे समितीचा अहवाल निव्वळ धुळफेक; विजय कुंभारांचा आरोप
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर बदलले political dynamics; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना बदल पचवायला जातोय जड!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या काही दिवसांमधून समोर आली. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता 26 फेब्रुवारीला त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड सुद्धा होईल. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना मात्र अजूनही अजित पवारांच्या “सावलीतून” बाहेर पडायची इच्छाच होत नाही, म्हणून तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या घालून राष्ट्रवादीतले राजकारण बिघडवू पाहत आहेत. पण त्यांना अपेक्षित यश यायला तयार नाही. कारण आता शरद पवारांच्या किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या हातात खऱ्या अर्थाने राजकीय डावांचे पत्तेच उरलेले नाहीत.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बंजारा समाजातील मान्यवरांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन आज गौरविले.
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर; तर पाणी फेरणार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर!!, हीच राजकीय घडामोडी घडण्याची पुढच्या दोन महिन्यांमध्ये शक्यता आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला सरकारी यंत्रणा विलंब लावत असल्याचा आरोप करून अपघाताचा तपास खाजगी गुप्तहेर संस्थांकडे सोपवून रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात कायमचा खोडा घातला.
मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावल्याने राज्यात मोठा वादंग झाला. या फोटोला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस भर देत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आघाडीवर आहेत. त्यांनी म्हणे, “दादांची सावली” नावाची एक थीम तयार केली असून त्या थीम द्वारे अजित पवारांचे सावली म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्यासाठी आज कसारा – मनमाड, 131 किलोमीटरच्या ₹10,154 कोटींच्या 3 आणि 4 च्या नव्या मार्गिकांना मंजुरी दिली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.
ज्या नरेश अरोरा यांच्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला, त्याच नरेश अरोरा यांच्या बंधूंना सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार भेटले. पुण्यातल्या सर्किट हाऊस मध्ये त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वर्तुळात सुनेत्रा पवार विरुद्ध रोहित पवार यांच्यातले राजकीय द्वैत समोर आले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची “चूक” काढताच सुनील तटकरे यांनी गंभीर इशारा दिला. या गंभीर इशार्याचा अर्थ एवढाच की शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणात मोठा खोडा घालून ठेवला.
कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर 14 दिवसांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत येऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुत्र पार्थ आणि जय पवार होते.
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला.
शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App