ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले.
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट उठले आहेत. याचा अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोप निवडला आहे. गुरुवारी, वरिष्ठ कार्डिनल्सनी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये घोषणा केली की अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावे म्हणून ओळखले जाईल. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन पोप आहेत.
भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला तोंड देताना पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाकी नऊ आलेत. कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली.
जम्मू आणि काश्मीरसह भारतातील काही राज्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान आणि दोन जेएफ १७ विमान पाडले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्लेही हाणून पाडले.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमान पाडले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई दलाचे AWACS विमान त्यांच्याच पंजाब प्रांतात पाडले गेले. हे विमान पाकिस्तानच्या सीमेत पडल्याचे सांगण्यात येत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही.
जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप (ताडीवाल रोड, पुणे) यास ATS ने अटक केली. लॅपटॉप एक दोन नव्हे, तर तब्बल 15 वर्षे फरार होता.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातले मोदी सरकार पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किंवा अन्य कुठला स्ट्राईक कधी करणार याकडे डोळे लावून बसलेल्या सोशल मीडिया वीरांना भारत – पाकिस्तान युद्धाची एवढी “तहान” लागली आहे
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरचा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ठपका त्यांच्या वयाच्या 81 व्या वर्षी दूर झाला. कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपातून निष्कलंक बाहेर आले. शरद पवारांच्या एके काळच्या राजकीय शिष्याने भ्रष्टाचाराच्या आरोपातून “निष्कलंक” बाहेर येण्याची किमया साधली, पण त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राजकीय अथवा अन्य कुठल्या कर्तृत्वाचा किती भाग होता, हा संशोधनाचा विषय ठरावा.
चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची, पण प्रत्यक्षात कृती मात्र पाकिस्तानला चिथावणीची देण्याची राहिली असल्याची बाब पहलगाम हल्ल्यानंतर समोर आली. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर बाकी बड्या देशाच्या सगळ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरून बातचीत केली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आदी बड्या देशांच्या प्रमुखांचा समावेश होता. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे देखील भारताच्या पाठीशी उभे राहिले. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला नाही.
नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात […]
जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही मोठे निर्णय घेतले. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही काही पावले उचलली – जसं की वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा थांबवणं आणि भारतीय विमानांसाठी आपली आकाशमर्यादा बंद करणं.
जम्मू – काश्मीरच्या पहलगांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड, तरीही लिबरल पुरोगामी काढतायेत हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!! असला प्रकार काँग्रेसी आणि पवारांच्या राष्ट्रवादी संस्कृतीत वाढलेल्या पुरोगाम्यांनी सुरू केलाय. राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, छाया थोरात आदींनी हिंदुत्वाच्या विरोधात ट्विट केली.
पहलगाम मधल्या हिंदू हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर वेगवेगळे कठोर निर्बंध लादले. त्यामध्ये पंडित नेहरूंनी 1960 मध्ये पाकिस्तान बरोबर केलेला सिंधू जल करार मोदी सरकारने स्थगित केला. मात्र त्यामुळे पाकिस्तानला खरा हादरा बसला. पाकिस्तानी सरकारचा प्रचंड संताप झाला. भारताविरुद्ध आगपाखड करत पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारने भारताला नवी धमकी दिली.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे.
ठाकरे बंधू एकत्र, पवार + काँग्रेस अस्वस्थ!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधकांची एकत्रित गोची झाली आहे. वास्तविक शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या सत्तेला आव्हान देण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या गप्पा मारत आहेत
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
National herald case मध्ये गांधी परिवाराचा बचाव करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आज पत्रकार परिषदेत जे बोलले, त्यात एक “तथ्य” जरूर आहे, पण म्हणून तो मोदी सरकारने केलेला लोकशाही वरचा हल्ला आहे, हे त्यांचे म्हणणे मात्र चूक आहे.
ट्रम्प टेरीफ मुळे भारतात आज ब्लॅक मंडे आला. शेअर बाजार धडाधड कोसळून ब्लड बाथ झाला. रिलायन्स पासून टाटा पर्यंत सगळे शेअर्स कोसळले. गुंतवणूकदारांचे लाखो करोड रुपये पाण्यात गेले.
देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा “शाब्दिक खेळ” देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!! आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचा आणीबाणीतला गेम उलगडून सांगितला. विधानसभेत संविधान गौरव या विषयावरच्या विशेष चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी संविधानाच्या विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर आज आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App