भारत माझा देश

Draupadi Murmu

Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुंभनगरी गाठली अन् संगमात केले पवित्र स्नान

सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळावर पोहोचले. यानंतर दोघेही संगम क्षेत्रात पोहोचले. त्या आज आठ तासांपेक्षा जास्त काळ संगम शहरात असतील.

Manipur

Manipur : वाढत्या असंतोषामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा कसा झाला?

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 31नक्षली ठार, 2 जवान शहीद, 2 जखमी; बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातून 12 मृतदेह व शस्त्रे जप्त

वृत्तसंस्था बिजापूर : Chhattisgarh छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी झालेल्या चकमकीत १००० हून अधिक सैनिकांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या चकमकीत २ डीआरजी आणि एसटीएफ जवान […]

Draupadi Murmu

राष्ट्रपतींची ही भेट केवळ प्रयागराजसाठी ऐतिहासिक नाही तर देशभरातील भाविकांसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे

सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले.

Air Force

Air Force : हवाई दल आणि लष्कर प्रमुखांचे तेजसमध्ये उड्डाण; पहिल्यांदाच 2 लष्करप्रमुख एकाच लढाऊ विमानात एकत्र

रविवारी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एलएसी येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळुरूमध्ये एअरो इंडिया-२०२५ सुरू होण्याच्या एक दिवस आधी दोन्ही लष्कर प्रमुख तेजस लढाऊ विमानात बसले. एअरो इंडिया-२०२५ कार्यक्रम १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान चालेल.

Mahakumbh

महाकुंभात भाविकांची अभूतपूर्व गर्दी, संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद

महाकुंभात भाविकांची अलोट गर्दी होत आहे. गर्दीमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

CM Atishi

CM Atishi : पीएम मोदींच्या अमेरिका भेटीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय; CM आतिशी यांचा राजीनामा

दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव फायनल केले जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. खरंतर, पंतप्रधान मोदी फ्रान्स-अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा त्यांच्या दौऱ्यानंतरच होईल. यामध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.

PM Modi

PM Modi : PM मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या AI समिटला उपस्थित राहणार; AIच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी फ्रान्स दौऱ्यावर रवाना होतील. येथे पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत करतील. यामध्ये, जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान तज्ञ एआयसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील.

Finance Minister

Finance Minister : अर्थमंत्र्यांची RBI बोर्डासोबत बैठक; अर्थसंकल्पातील निर्णय, आयकरात देण्यात आलेल्या सवलतींची माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या केंद्रीय मंडळासोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांबद्दल सांगितले ज्यामध्ये आयकरात देण्यात आलेल्या सवलतींचा समावेश आहे. या बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

राहुल गांधी स्वतःची इमेज स्वतःच्याच हाताने “डॅमेज” करून घेतली; काँग्रेसच्या “परफॉर्मन्सला” साजेशी नाही उरली!!

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज अवघ्या ९ महिन्यांमध्ये घटली. काँग्रेसच्या परफॉर्मन्सला साजेशी देखील नाही उरली!!

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा नियोजनपूर्वक “तडकाफडकी” राजीनामा; अशांत मणिपूरला दिली राजकीय तोडग्याची दिशा!!

दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना तिकडे पूर्वोत्तर राज्य मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजनपूर्वक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे मणिपूर राजकीय तोडग्याच्या दिशेने निघाल्याचे स्पष्ट झाले.

Acharya Pramod Krishnam

Acharya Pramod Krishnam : दिल्ली निवडणुकीच्या निकालांवरून आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस अन् राहुल गांधींवर टीका केली

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना, माजी काँग्रेस नेते आणि कल्किपीठधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राजकारणात जय-पराजयाचे चक्र सुरूच असते, परंतु सध्या सनातनचा युग आहे. जो कोणी सनातनचा झेंडा धरून पुढे जाईल, तो सत्तेच्या सिंहासनावर बसेल.

Kumar Vishwas

Kumar Vishwas : ‘ही ‘आप’च्या पराभवाची सुरुवात आहे’, दिल्ली निवडणूक निकालांवर कुमार विश्वास यांचा टोला

भारतीय राजकारणावरील त्यांच्या विचारांसाठी आणि विधानांसाठी प्रसिद्ध असलेले कवी कुमार विश्वास यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हे आम आदमी पक्षाच्या (आप) पराभवाची सुरुवात असल्याचे म्हटले. माध्यमांशी बोलताना कुमार विश्वास यांनी आशा व्यक्त केली की भाजप राजधानीतील दीर्घकालीन समस्या सोडवेल.

Nitish Kumar

Nitish Kumar : ‘दिल्लीतील अहंकारी नेतृत्व आणि कुशासनाचा अंत झाला’ ; नितीश कुमारांनी भाजपचे केले अभिनंदन

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिल्लीतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन.

Milkipur

Milkipur : अयोध्येच्या पराभवाची परतफेड; भाजपने सपकडून मिल्कीपूर घेतले, 61 हजार मतांनी सर्वात मोठा विजय

मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपने अयोध्या पराभवाची परतफेड केली आहे. ८ वर्षांनी मिल्कीपूर हिसकावून घेतले आहे. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी सपाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा ६१५४० हजार मतांनी पराभव केला.

Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman : पुढील आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक सादर होण्याची अपेक्षा – निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सांगितले की, येत्या आठवड्यात त्यांना एक नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची आशा आहे आणि ते संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीकडे छाननीसाठी पाठवले जाईल.

Kolkata celebrates

Kolkata celebrates : दिल्लीत भाजपच्या विजयावर कोलकातामध्ये जल्लोष ; बंगालमध्येही कमळ फुलण्याचा निर्धार

दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ऐतिहासिक विजयानंतर कोलकातामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करतात. पश्चिम बंगाल भाजपा राज्य कार्यालय, मुरलीधर सेन लेन बाहेर विजय उत्सव आयोजित करण्यात आला होता,

Rahul Gandhi

Rahul Gandhi : दिल्लीतील मानहानीकारक पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शनिवारी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, जे पक्षासाठी मोठा धक्का आहे.

Delhi Election

Delhi Election : दिल्ली निवडणूक: शिंदे यांनी भाजपच्या विजयाला ‘मोदींच्या गॅरंटीचा ‘ चमत्कार म्हटले

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भाजपच्या या शानदार विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

Modi

Modi : दिल्लीत काँग्रेसने ‘शून्य’ ची दुहेरी हॅटट्रिक केली ; मोदींनी लगावला टोला!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांना एक-एक करून संपवत आहे आणि त्यांची पद्धत खूपच मनोरंजक आहे.

narendra modi

Narendra Modi : 19 राज्यांत भाजप युतीचे सरकार; मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात 8 राज्यांत निवडणुका, NDAने 6 जिंकल्या

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळजवळ स्पष्ट झाला आहे. भाजप 27 वर्षांनंतर सत्तेत परतत आहे. सध्या, 70 जागांपैकी भाजप 48 जागांवर आणि आप 22 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती.

Modi's

Modi’s : भाजपच्या दिल्ली दिग्विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन, म्हणाले- ‘यमुना मैय्या की जय’, यमुनेलाच दिल्लीची ओळख बनवू

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यमुना मैया की जय या घोषणेसह केली.

CM Fadnavis

CM Fadnavis : भाजपच्या दिल्ली विजयावर CM फडणवीस म्हणाले- अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला; खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करण्याच्या परंपरेचा अंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयामु्ळे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला असून, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला आहे, असे ते म्हणालेत.

BJP's

BJP’s : भाजपची मतांची टक्केवारी आपपेक्षा 3.6% जास्त; 26 जागा जास्त जिंकल्या

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे निकाल शनिवारी आले. भाजपला 27 वर्षांनंतर स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने 48 जागा जिंकल्या आणि आम आदमी पक्षाने (आप) 22 जागा जिंकल्या.

Congress-AAP

Congress-AAP : काँग्रेस-आप एकत्र असते तर आणखी 12 जागा जिंकल्या असत्या; विरोधी पक्षात फूट पडल्याने नुकसान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Congress-AAP भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, भाजपला 45.97% मते मिळाली आहेत. तर आपला भाजपपेक्षा 2.31% कमी म्हणजेच 43.66% मते मिळाली आहेत. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात