पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक होता. असे मत ASSOCHAM आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) या आघाडीच्या उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे.
दोन जणांचा मृत्यू, आठ जण जखमी विशेष प्रतिनिधी इंफाळ : Manipur मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने कॅम्पमध्ये गोळीबार केला, ज्यामध्ये २ जवान मृत्युमुखी पडले आणि ८ […]
दिल्लीतील निवडणूक निकालानंतर आता सर्वांना नव्या सरकारची प्रतीक्षा आहे. अडीच दशकानंतर भाजपने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आहे. तर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाब अद्याप सस्पेन्स आहे, मात्र लवकरच आता नवीन सरकारच्या शपथविधी समारंभ होवू शकतो. यासाठी १९ किंवा २० फेब्रुवारी या दिवसांची चर्चा आहे. तर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान मोदी घरी परतल्यानंतरच घेतला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विकासकामांवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जाहीर कौतुक केले आहे. गडकरी म्हणाले, उत्तर प्रदेशला भारतातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या संकल्पाने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर सतत भर देत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आता देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक बनले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS), २०२३ च्या कलम २१८ अंतर्गत जैन यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.
आंतरराष्ट्रीय जगतात भारताची ओळख आता संरक्षण क्षेत्रातला निर्यातदार अशी होत असताना फ्रान्स सारख्या विकसित राष्ट्राने भारताकडून संरक्षण सामग्री आयात करण्यात रस दाखविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस मध्ये भेट घेतली. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन केले.
युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाशी संबंधित सर्व प्रकरणांवर एकत्रित सुनावणीची अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रक्रियेनुसार होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रणवीर इलाहाबादियाविरुद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुरुवारी मणिपूरमधील एका छावणीत एका सीआरपीएफ जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले. या सर्वांना इम्फाळ येथील रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर आरोप केला की गोगोई यांच्या पत्नीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत. भाटिया म्हणाले- राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की त्यांची लढाई भारतीय राज्याशी आहे. आता गोगोई यांच्या पत्नीचे पाकिस्तानच्या आयएसआयशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाजीपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी महाकुंभमेळ्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी शादियााबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष देवप्रकाश सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.
पुलवामामध्ये सहा वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले होते. यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण घेऊन पुढे जात आहे आणि आम्ही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची उत्तम निगोशिएटर म्हणून स्तुती केली. त्यांना “मिस्टर प्राईम मिनिस्टर, युआर ग्रेट”, असे लिहून मोठे फोटो बूक भेट दिले.
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सर्वदृष्टीय संबंधात मोठे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत – अमेरिका व्यापार दुपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 500 बिलियन डॉलर्स वर पोहोचवण्याचा निर्धार केला
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाबाबतच्या निकालापूर्वी त्यांनी देवाकडे तोडगा काढण्यासाठी प्रार्थना केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी फेटाळून लावला आहे. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की या गोष्टी सोशल मीडियाची निर्मिती आहेत. माझे विधान चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले. घटस्फोटाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महिलेसाठी ‘अवैध पत्नी’ आणि ‘अविश्वासू प्रेयसी’ असे शब्द वापरले होते.
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. बरोबर १ वर्षापूर्वी आजच्या दिवशी, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी, ही योजना सुरू झाली. याअंतर्गत, १ कोटी कुटुंबांना प्रत्येकी ३०० युनिट मोफत वीज मिळते.
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणतात की जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे. जर सगळं ठीक असेल तर पाकिस्तानसोबतचे सर्व मार्ग खुले करा. जेणेकरून ते इथे येऊन आपण कसे राहतो आणि येथे काय आहे, ते पाहू शकतील.
केंद्र सरकारने गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी रात्री 2.30 वाजता व्हाईट हाऊसमध्ये भेटतील. यानंतर, अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. या काळात दोघेही द्विपक्षीय बैठक घेतील आणि त्यानंतर एक प्रेस निवेदन देखील जारी केले जाईल. या बैठकीत दोन्ही नेते टॅरिफ आणि बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील असे म्हटले जात आहे.
UN रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासे! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Mohammad Yunus मागील वर्षी बांगलादेशातील विद्यार्थी चळवळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात […]
नवी दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नवीन एफआयआर प्रकरणात त्यांनी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला, त्यानंतर विरोधी पक्षांनी निषेध केला आणि गोंधळ घातला. काँग्रेसने अहवालाला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की आमच्या अहसमतीस अहवालात स्थान देण्यात आलेले नाही.
महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यातील नागवासुकी परिसराजवळ ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तंबू रिकामे करण्यात आले होते.
Waqf बोर्ड सुधारणा विधेयका संदर्भात विरोधकांच्या सर्व सूचना परिशिष्ट यामध्ये सरकारने सामील केल्या तरी देखील विरोधकांचा जळफाळाट झाला. लोकसभा राज्यसभेतील सभात्याग केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App