मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव ११ मे पासून मंदिरात नारळ, हार आणि प्रसाद अर्पण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले हे मंदिर एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे जे मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, मंदिराला दररोज हजारो लोक भेट देतात आणि ते दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेवर वारंवार गोळीबार करत आहे आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे. शुक्रवारी मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. भारतीय सैन्याने बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेत पाडले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. ९ आणि १० मे रोजीच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर केला. तथापि, भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले. यानंतर, भारतीय हवाई दलाने कारवाई करत क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त केले. याशिवाय, भारतीय सैन्याने अनेक रडार सिस्टीम देखील नष्ट केल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन तुर्कीने बनवलेले असल्याचे समोर आले आहेत.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारताने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारल्यानंतर तसेच 7 लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानची भाषा थोडी बदलली. आम्हाला युद्ध नको
पाकिस्तानने शनिवारी भारताविरुद्ध ‘ऑपरेशन बुनयान उल मर्सूस’ सुरू केले, ज्यामध्ये त्यांनी भारतावर फतह-II (फतह-2) क्षेपणास्त्र डागले. पण भारतीय सुरक्षा दलांनी हरियाणातील सिरसा येथे हे क्षेपणास्त्र रोखले आणि हवेतच ते उद्ध्वस्त केले. या क्षेपणास्त्रामुळे, पाकिस्तानचे वाईट हेतूही तिथेच नष्ट झाले जिथे त्यांचे फतह-२ पडले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हताश झाला आहे आणि तो सतत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, जो भारतीय सैन्य हाणून पाडत आहे.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.
बुधवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि पठाणकोटसह ११ भागात पाकिस्तानने १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, परंतु क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली S400 आणि आकाशने हा हल्ला उधळून लावला.
ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. दोन्ही देशांची तयारी तीव्र झाली आहे. या परिस्थितीत, शाहजहांपूरच्या गंगा एक्सप्रेसवेचे महत्त्व अलिकडे आणखी वाढले आहे. भारतीय हवाई दलाने २ मे रोजी येथे पहिले रात्रीचे लँडिंग करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. हा केवळ रात्रीच्या लँडिंगसाठीचा सराव नव्हता तर युद्धादरम्यान एक मोठा गेम चेंजर ठरेल.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला शुक्रवारी एनआयए रिमांडमधून पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तहव्वुरला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, राणाला नियोजित तारखेच्या एक दिवस आधी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर राणाला तिहार तुरुंगात नेण्यात आले.
अरुणाचल प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी राज्यात अतिरेकी भरती, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि सीमापार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले,
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच स्थगित करण्यात आले आहे. एका आठवड्यानंतर ते पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आता २४ मे पासून बंगळुरू येथे होणारी नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, राफेल बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स गेल्या २ आठवड्यात ८% पेक्षा जास्त वाढले आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता पाकिस्तानसोबतच्या तणावावर परराष्ट्र मंत्रालयाने सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली.
इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम आता पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएल २०२५ अंतर्गत होणारे उर्वरित सामने सध्या खेळवले जाणार नाहीत. धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना काल रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत, आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आयपीएल २०२५ स्थगित करण्यात आले आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर, बोर्ड पुन्हा या स्पर्धेच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकते.
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, ही विधाने स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले होते.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्ध राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे आणि भारत सरकार आणि सशस्त्र दलांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App