भारत माझा देश

Asaram-Narayan Sai

Asaram-Narayan Sai’ : आसाराम-नारायण साईच्या कट्टर अनुयायाला यूपीतून अटक; तामराज 6 राज्यांत होता वाँटेड, धर्म बदलून स्टीफन बनला

गेल्या दहा वर्षांपासून फरार असलेला आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांचा कट्टर अनुयायी ताम्रध्वज उर्फ ​​तामराजला अखेर १० वर्षांनी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. आसारामविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक लोकांच्या हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी आरोपी ६ राज्यांमध्ये हवा होता. एवढेच नाही तर हरियाणा सरकारने त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

Sushil Kumar

Sushil Kumar : सागर धनखड हत्याकांडप्रकरणी कुस्तीगीर सुशील कुमारला जामीन मंजूर; मृताच्या आईने म्हटले- त्याला फाशी द्यावी

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमार तुरुंगातून बाहेर येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीगीराला जामीन मंजूर केला आहे. ज्युनियर कुस्तीगीर सागर धनखड हत्याकांड प्रकरणात तो 4 वर्षे तिहार तुरुंगात होता. उच्च न्यायालयाने सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामिनावर सोडले आहे.

India ranks

India ranks : भारत श्रीमंतांच्या संख्येत चौथ्या स्थानावर; 2024 मध्ये 85,698 अतिश्रीमंत, दरवर्षी 6% वाढ

भारत जगातील श्रीमंत लोकांच्या संख्येनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. 2024 पर्यंत भारतात 85,698 अतिश्रीमंत (एचएनआय) असतील, आणि ही संख्या दरवर्षी 6% वाढत आहे, असे ‘द वेल्थ रिपोर्ट 2025’मध्ये सांगण्यात आले आहे.

Bengal

Bengal : भाजपने म्हटले- बंगालमध्ये जात सर्वेक्षणामुळे भेदभाव वाढेल:याचा फायदा मुस्लिमांना; ममता म्हणाल्या होत्या- भाजप बनावट मते जोडत आहे

पश्चिम बंगाल भाजपचे सरचिटणीस जगन्नाथ चॅटर्जी यांनी बुधवारी सांगितले की, तृणमूल काँग्रेस सरकार जाती-आधारित सर्वेक्षण करून जातीय भेदभाव वाढवू इच्छित आहे. त्यांचा उद्देश मुस्लिम ओबीसींना फायदा पोहोचवणे आहे, त्यामुळे हिंदू ओबीसींना नुकसान होईल.

Jaishankar

पाकिस्तानने चोरलेले काश्मीर भारताने परत मिळवले, की तो प्रश्न कायमचा सुटेल, जयशंकरांनी पाकिस्तानी पत्रकाराला सुनावले!!

पाकिस्तानने चोरलेले काश्मीर भारत आणि परत मिळवले, की तो प्रश्न ताबडतोब आणि कायमचा सुटेल असे “आश्वासन” मी सगळ्यांना देतो, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पत्रकाराला सुनावले.

Mani Shankar

Mani Shankar : मणिशंकर म्हणाले- दोनदा नापास होऊनही राजीव पंतप्रधान झाले; काँग्रेसने म्हटले- ते एक हताश व्यक्ती

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढ्या वाईट शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान कसे बनवले गेले याचे त्यांना आश्चर्य वाटले.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : सावरकरांवर टीका केल्याबद्दल राहुल गांधींना 200 रुपये दंड; लखनऊ कोर्टाने म्हटले- 14 एप्रिलला हजर राहा

लखनऊच्या एका न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने दंड ठोठावला. तसेच १४ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयात हजर राहावे, जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला.

Yogi

Yogi : योगी म्हणाले- अबू आझमींना यूपीत पाठवा, इलाज करू; औरंगजेबासारखी कम्बख्त औलाद कोणालाच नसावी!

उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांनी विधान परिषदेत प्रतिक्रिया दिली. म्हणाले- हे लोक (सपा) औरंगजेबाला आपला आदर्श मानत आहेत. त्याचे वडील शाहजहान त्यांच्या चरित्रात लिहितात – खुदा करे कि ऐसा कम्बख्त किसी को पैदा न हो.

द फोकस एक्सप्लेनर : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर 100% टॅरिफ लावल्यास काय होईल? वाचा सविस्तर

भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मजबूत व्यापारी संबंध आहेत. 2023 मध्ये भारताने अमेरिकेत *$80.2 अब्ज (₹6.7 लाख कोटी)* किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली.

Yogi Adityanath उस कमब्खको पार्टी से निकालो और यूपी भेजो. बाकी इलाज हम करेंगे, योगी आदित्यनाथ यांचा अबू आझमी यांच्यावर संताप

उस कमब्खको पार्टी से निकालो और यूपी भेजो. बाकी इलाज हम करेंगे. जो व्यक्ती औरंगजेब को नायक मानता है उसे भारत मे रहने का अधिकार होना चाहिये क्या?

Chandrashekhar Azad

Chandrashekhar Azad : चंद्रशेखर आझाद यांचे आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फेटाळले, म्हटले…

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठात लोकसभा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित राजकीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध केला आहे.

Bofors scam case

Bofors scam case : बोफोर्स घोटाळा प्रकरणी सीबीआयने अमेरिकेला पाठवले पत्र

बोफोर्स घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अमेरिकेला एक पत्र पाठवले आहे. सीबीआयने अमेरिकेला पाकिस्तानी गुप्तहेर मायकेल हर्शमॅनचा शोध घेण्याचे आणि त्याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

2026 Lok Sabha Delimitation

Delimitation ची म्हैस अजून पाण्यात; पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडूत राजकीय सौदेबाजी जोरात!!

अर्थात लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेरचनेची म्हैस अजून पाण्यात, पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडू राजकीय सौदेबाजी जोरात!!, असे राजकीय चित्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज चेन्नईत उभे केले.

Election Commission

Election Commission : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल- किती कलंकित नेत्यांना सूट दिली? किती जणांची 6 वर्षांची बंदी कमी केली?

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (४) निवडणूक आयोगाकडून (EC) अशा कलंकित राजकारण्यांची यादी मागितली ज्यांच्यावरील निवडणूक लढवण्यावरील बंदी कालावधी कमी केला आहे किंवा काढून टाकला आहे.

Kannada film actress

कन्नड चित्रपट अभिनेत्री अन् पोलिस महासंचालकांच्या मुलीस १४ किलो सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक

गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता.

Mian-Pakistani

Mian-Pakistani : एखाद्याला मियां-पाकिस्तानी म्हणणे चुकीचे, पण गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाने खटला फेटाळला

झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘एखाद्याला ‘मियाँ-तियां’ किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे हा गुन्हा नाही.’ जरी ते चुकीचे असले तरी, भारतीय दंड संहितेच्या कलम 298 अंतर्गत ते धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही. ही टिप्पणी कर

Supreme Court

Supreme Court : राज्य सरकारे स्वस्त उपचार देण्यात अपयशी; सूप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘राज्य सरकारे परवडणारी वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरली आहेत. यामुळे खाजगी रुग्णालयांना चालना मिळत आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने एक मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

Union Minister Athawale

Union Minister Athawale : आकाश आनंद यांना आरपीआयमध्ये सामील होण्याची ऑफर; केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले- आम्हाला उत्तर प्रदेशात ताकद मिळेल!

बसपा प्रमुख मायावती यांनी प्रथम आकाश आनंद यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले आणि नंतर त्यांना पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. आठवले यांनी आकाश आनंद यांना आरपीआयमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

Abu Azmis

Abu Azmis : अबू आझमीचा मुलगा फरहान अडचणीत, गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला

गोवा पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतरांविरुद्ध राज्यातील सार्वजनिक ठिकाणी हल्ला आणि शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Supreme Court

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या, सर्वोच्च सुनावणी 2 महिने लांबणीवर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन – तीन महिन्यांत होण्याची शक्यता मावळली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आणखी दोन महिने लांबल्याने आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले आहे.

Gadchiroli

Gadchiroli : गडचिरोली पोलीस दल ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ने सन्मानित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमाला भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंग श्रेणीतून ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ सन्मानित करण्यात आले.

Himanta Biswa Sarma

Himanta Biswa Sarma : आसाम सरकारचा मोठा निर्णय, ‘हे’ इलेक्ट्रॉनिक शहर आता रतन टाटांच्या नावाने ओळखले जाणार

आसाम सरकारने मंगळवारी दिवंगत रतन टाटा आणि राज्याच्या विकासात मोठे योगदान देणारे प्रख्यात उद्योगपती टाटा समूह यांना श्रद्धांजली वाहणारी एक महत्त्वाची घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, जागीरोड येथे उभारल्या जाणाऱ्या आगामी इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी, जागीरोड असे ठेवले जाईल.

Tamil Nadu

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये भाषा वादावरून काँग्रेस अन् भाजप आमनेसामने

तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारवर नवीन शिक्षण धोरण २०२० अंतर्गत त्रिभाषिक सूत्रावर हिंदी भाषा लादल्याचा आरोप केला आहे. तर तामिळनाडूतील भाषेच्या वादावरून आता भाजप आणि काँग्रेस नेते आमनेसामने आले आहेत.

Virat Kohli

Virat Kohli विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये मोडले ५ मोठे विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Jharkhand

Jharkhand : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत, पश्चिम सिंहभूम (चाईबासा) जिल्ह्यातील पोलिस आणि सुरक्षा दलांनी जंगल आणि पर्वतांनी वेढलेल्या परिसरात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात