तुम्ही खरे भारतीय असता, तर असलं बोलला नसतात, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचे वाभाडे काढले. भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले. चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. पण खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.
२९ जुलै रोजी बांगला भवनला लिहिलेल्या अधिकृत पत्रात दिल्ली पोलिसांनी बांगला भाषेचे वर्णन बांगलादेशी भाषा असे केले. त्यात लिहिले होते, ‘भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे बांगलादेशी भाषेत आहेत. अशा परिस्थितीत, पुढील तपासासाठी बांगलादेशी राष्ट्रीय भाषेचा अधिकृत अनुवादक उपलब्ध करून द्या.’
निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना मतदार कार्डचे दोन EPIC क्रमांक कसे मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बिहारच्या दिघा विधानसभेच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही EPIC क्रमांक RAB2916120 दाखवला होता, जो अधिकृतपणे जारी केलेला नाही.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल-जून तिमाहीत, वार्षिक आधारावर त्यात ११४% वाढ […]
रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो… मित्रांसोबत अंधारात, निर्जन ठिकाणी जाऊ नका. सामूहिक बलात्कार होऊ शकतो… शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या रस्त्यांवर या वादग्रस्त शब्दांचे पोस्टर दिसले. तथापि, वादानंतर, काही वेळातच हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकाच कॅटेगरीत आले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आरोपांचे हिट अँड रन केले, पण निवडणूक आयोगाने त्यांना बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शेतकरी कायद्याला आणि सरकारला विरोध केल्याबद्दल धमकी दिल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, मला आठवते की जेव्हा मी शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते.
शनिवारी गुरुग्राममध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत. खट्टर म्हणाले की, केवळ २०२४ मध्येच नाही, तर २०१९ मध्येही राहुल गांधी हेच बोलत होते आणि २०२९ च्या निवडणुकांबद्दलही ते हेच म्हणतील.
अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे ३ ऑगस्ट रोजीच ती थांबवण्यात आली.काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, पावसामुळे यात्रा मार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे यात्रा थांबवावी लागली आहे. मार्गांवर सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की बीएलओने येऊन आमची पडताळणी केली. तरीही आमचे नाव मतदार यादीत नाही.
राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाले, भारताची निवडणूक व्यवस्था मृतप्राय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कशी धांधली होऊ शकते हे आम्ही येत्या काळात तुम्हाला सिद्ध करू आणि ते घडलेही आहे.
बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.
भारतीयांच्या घामातून, मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूला ‘स्वदेशी’ म्हणतात,” अशी साधी आणि प्रभावी व्याख्या करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये नागरिकांना “व्होकल फॉर लोकल” या मंत्राचे महत्त्व समजावून देत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे आवाहन केले.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना हरियाणातील गुरुग्राममधील शिकोहपूर गावातील संशयित जमीन व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाने नोटीस बजावली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने वाड्रा आणि इतर १० आरोपींना ही नोटीस पाठवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याला नेमकं झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार शिंदे + पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्या रांगेत जाऊन का बसलेत??, असा सवाल पृथ्वीराज बाबांच्या वक्तव्यामुळे समोर आला.
जुलै २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारने १.९६ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. वार्षिक आधारावर त्यात ७.५% वाढ झाली आहे. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये सरकारने १.८२ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा केले होते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. २०२३ सालातील उत्कृष्ट चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंना या पुरस्कारांमधून गौरवण्यात आले आहे.
कंबोडियाच्या सरकारने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कंबोडियाचे उपपंतप्रधान सन चंथोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेल्या सीमासंघर्षावर ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरले आणि शांतता प्रस्थापित झाली. ट्रम्प यांनी हे संकट शांततेने हाताळले आणि आमच्या देशात पुन्हा स्थिरता आली. त्यामुळे अशा नेत्यानं जागतिक शांततेसाठी मिळणारा सर्वोच्च सन्मान मिळवावा, अशी आमची भूमिका आहे,” असे चंथोल यांनी फ्नॉम पेन्ह येथे सांगितले.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी 21 ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल केले जाईल. जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.
हिमाचल प्रदेशच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांची मानहानीची तक्रार रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांचे भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याच्या विधानाचे खंडन केले आहे. शुक्रवारी संसदेच्या आवारात माध्यमांनी थरूर यांना विचारले की, भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले – नाही, ते अजिबात नाही, सर्वांना माहिती आहे.
शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १० वा दिवस होता. बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत सदस्यांना रोखण्यासाठी कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App