आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आपल्याला पुन्हा सोन्याची चिडिया बनायचे नाही, तर आपल्याला सिंह बनायचे आहे. जगाला फक्त शक्ती समजते आणि भारत एक शक्तिशाली देश असावा. ते म्हणाले की, शिक्षण असे असले पाहिजे की ते माणसाला स्वावलंबी बनवते आणि त्याला कुठेही स्वतःच्या बळावर टिकून राहण्याची क्षमता देते. भागवत यांनी केरळमधील शिक्षण परिषदेच्या ज्ञान सभेत या गोष्टी सांगितल्या.
ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र; पण त्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशींना चिकटवले भारताचे नागरिकत्व!!, असे पश्चिम बंगाल मधल्या राजकीय खेळीतून समोर आले. बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक आयोगाचे मतदारांचे परीक्षण सुरू होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाषा आंदोलनाचे शस्त्र उपसले. त्यासाठी त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची जन्मभूमी बीरभूमची भूमी निवडली. बीरभूम ते कलकत्ता असे आंदोलन करायची घोषणा केली. पण त्याचवेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींना बंगाली नागरिक अर्थात भारतीय नागरिक अशी संज्ञा देऊन त्या मोकळ्या झाल्या.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधले दहशतवादी अड्डे नष्ट केले.
केंद्र सरकार देशातील २६ कोटी शालेय मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य शाळेतच तपासणार आहे. आयुष्मान भारत शालेय आरोग्य अभियानाची पहिली चाचणी त्रिपुरामध्ये यशस्वी झाली आहे.
भाषा उच्च अर्थतज्ज्ञांची; प्रत्यक्षात भलामण चिनी मालाची!!, असेच चित्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींमधून समोर आली.
उत्तर प्रदेशातील बाराबंकीतील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले. रविवारी रात्री २ वाजता जलाभिषेक दरम्यान मंदिर परिसरात अचानक वीज पसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय लष्कर प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील एका अग्रेषित चौकीला भेट दिली आणि १८ जम्मू आणि काश्मीर रायफल्स (१८ जेएके आरआयएफ) च्या सैनिकांची भेट घेतली.
निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या पहिल्या टप्प्याचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार, बिहारमध्ये आता ७.२४ कोटी मतदार आहेत. पूर्वी हा आकडा ७.८९ कोटी होता. मतदार यादी पुनरावृत्तीनंतर, ६५ लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सोमवारी, लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर १६ तास मॅरेथॉन चर्चा होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करतील. गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर देखील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. पंतप्रधान मोदी देखील चर्चेत सहभागी होऊ शकतात.
विशेष प्रतिनिधी वडोदरा :” Rajnath Singhगेल्या ११ वर्षांमध्ये भारतात अभूतपूर्व पायाभूत सुविधा विकास झाला आहे. युद्ध केवळ बंदुका आणि गोळ्यांनी जिंकले जात नाहीत, तर त्या […]
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन 6 दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याचे राजकीय लळिताचे कीर्तन संपलेले नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कारवाईवर आधारित दोन विशेष अभ्यास मॉड्यूल्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या विशेष धड्यांद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी ताकदीची ओळख करून देण्याचा उद्देश आहे.
बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आतापर्यंत २२ लाख मृत आणि ७ लाख डुप्लिकेट मतदारांची ओळख पटली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्याच वेळी २४ जूनपासून ३५ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. आयोगाने ६४ लाख मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत एकूण ६४ लाख नावे मतदार मसुदा यादीतून बाहेर पडतील. निवडणूक आयोगाचे उपसंचालक पी. पवन म्हणाले, राज्यात एकूण ७ कोटी ८९ लाख ६९ हजार ८४४ मतदार आहेत. यापैकी ७ कोटी २३ लाखांनी मतमोजणी अर्ज सादर केले आहेत.
भारतीय रेल्वेने २.५ कोटींहून अधिक आयआरसीटीसी युजर आयडी निष्क्रिय केले आहेत. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.प्रगत डेटा विश्लेषणाद्वारे संशयास्पद बुकिंग पॅटर्न आणि वापरकर्त्यांचे वर्तन ओळखल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार एडी सिंह यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने याची पुष्टी केली आहे.
बिहारमधील गया येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय मुलीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी चालक आणि तंत्रज्ञांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला गप्प राहण्याची धमकी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे ४,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये नवीन विमानतळ टर्मिनल, महामार्ग, बंदर आणि रेल्वे विकास आणि वीज पारेषण प्रकल्पांचा समावेश आहे.
शनिवारी जाहीर झालेल्या ‘डेमोक्रॅटिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग’ मध्ये पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर आहेत. त्यांना ७५% अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग दुसऱ्या स्थानावर आहेत.
लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासगुडा भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ नक्षलवाद्यांना ठार मारले. या सर्वांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत ज्यात INSAS-SLR रायफल्सचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.
बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजय दिन परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.
ज्या उत्तर प्रदेशाला मागास म्हणून आतापर्यंत सगळ्या देश हिणवत आला होता, तिथे कुशल कामगार आहेत आणि ते केवळ देशातच नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत असे आता सिद्ध झालेय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App