देशाच्या आर्थिक सर्वेक्षणातून दाखविले विकसित भारताचे स्वप्न, पण मांडले वास्तवाचे देखील चित्र!!, असेच 2025 च्या आर्थिक सर्वेक्षणाचे वर्णन करावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण काही क्षेत्रातली आकडेवारी चिंताजनक नसली, तरी गंभीर इशारा देणारी निश्चित आहे. किंबहुना तो इशारा लक्षात घेऊन आधीपासूनच काळजीपूर्वक उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सांगणारी आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 रोजी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सटीक भाष्य करण्यात आले असून त्यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (GDP) वाढ 2025 मध्ये सर्वांत आस्ते कदम राहणार असल्याचे सूचित केले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. १८ व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले की, माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण बजेट आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल.PM Modi
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा मुलगा ॲलेक्स सोरोस यांची भेट घेतली आहे. ढाका येथील ओपन सोसायटी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली. युनूस गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ॲलेक्सला भेटले आहे.
इंदिरा गांधींच्या काळात सर्व समावेशक धोरण अवलंबलेल्या काँग्रेसने 1990 नंतरच्या काळात चुकीची धोरणे अवलंबल्याने दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक काँग्रेस पासून दूर गेले, या चुका जर सुधारल्या, तर हे सगळे वर्ग काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा उभे राहतील
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यमुनेच्या पाण्यावरून गुरुवारी अरविंद केजरीवाल आणि निवडणूक आयोग यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना पत्र लिहून 5 प्रश्न विचारले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज रोहिणी येथील सभेत सांगितले की, केजरीवाल म्हणायचे की ते यमुनेचे पाणी लंडनमधील थेम्स नदीसारखे बनवतील आणि ते स्वतः त्यात डुबकी मारतील. पण केजरीवाल आजपर्यंत का डुबकी घेत नाहीत?
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना गुरुवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीतील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून मालीवाल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी कचरा फेकण्यासाठी गेल्या होत्या.
शुक्रवारपासून (31 जानेवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात 16 विधेयके येऊ शकतात. यामध्ये 2024 च्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 12 विधेयके आणण्यात आली होती. वित्त विधेयकाव्यतिरिक्त, चार नवीन विधेयकांमध्ये एअरक्राफ्ट ऑब्जेक्ट्स, त्रिभुवन को-ऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आणि इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयकाचा समावेश आहे.
चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी भारत पुढील १० महिन्यांत स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चॅटबॉट तयार करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही घोषणा केली. देशातील लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) १० महिन्यांत तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे मूलभूत मॉडेल असेल. त्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज म्हणजेच गुरुवारी छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोदी सरकारचा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडत असताना कर रचनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ आणि बड्या कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये वैयक्तिक कर कमी करा
उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोडवर बलात्काराचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर, पोलिसांनी राकेश राठोड यांना लोहारबाग येथील त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असताना अटक केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (३० जानेवारी २०२५) दिल्लीतील रोहिणी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, सरकारने बुधवारी एमएसएमई क्षेत्रासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी एक नवीन क्रेडिट हमी योजना सुरू केली. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) सुरू करण्यात आलेल्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम (MCGY-MSME) चा उद्देश उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र उद्योगांना १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा प्रदान करणे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, पंजाब भवनाजवळील कोपर्निकस मार्गावर पंजाब नंबर प्लेट असलेली एक गाडी आढळून आली ज्यावर पंजाब सरकार लिहिलेले होते. वाहनाची झडती घेतली असता त्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दारूच्या बाटल्या आणि आम आदमी पक्षाचे (आप) निवडणूक पत्रके जप्त करण्यात आली. भाजपने यासाठी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ, तर आम्ही मजबुतीनेच निवडणूक लढवतोय असे सांगायची काँग्रेसवर वेळ!! हा आजच्या दिवसभरातले दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी खूप जास्त भाडे आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने कारवाई केली. मंत्रालयाने विमान कंपन्यांना वाजवी तिकिटांचे दर राखण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी विमान कंपन्या प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या.
बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणांमध्ये चोहोबाजूंनी अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते.
महाकुंभातील मौनी अमावस्येच्या अमृत स्नानापूर्वी बुधवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाचे आदेश दिले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री योगी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीत महत्वपूर्ण घडामोडी घडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची मते फुटली. त्यामुळे पंजाब मधल्या चंडीगडची महापौर निवडणूक भाजपने जिंकली.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम दिले आहे. हे दोन्ही शास्त्रज्ञ गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते.
भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही महागड्या वस्तूंवर शुल्क कमी करू शकतो. NDTV च्या रिपोर्टनुसार, निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा करू शकतात. स्टील, महागड्या मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या यादीत आहेत, ज्यांचे दर कमी केले जाऊ शकतात.
मोदी सरकारचे संपूर्ण लक्ष देशाच्या सैन्याला बळकट करण्यावर आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App