रिलायन्स फाउंडेशनच्या जामनगर (गुजरात) येथील वनतारा ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू एंड रिहॅबिलिटेशन सेंटरविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एसआयटी स्थापन केली. न्या.पंकज मित्तल आणि न्या. प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. प्राण्यांची अवैध खरेदी, त्यांच्याशी गैरवर्तन, आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर दाखल याचिकांवर हा आदेश देण्यात आला.
कुणी कितीही दबाव आणला तरी स्वावलंबी भारत झुकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. सोमवारी अहमदाबादमध्ये एका रोड शो आणि जाहीर सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लघु उद्योजक, शेतकरी किंवा पशुपालकांचे हित सर्वोपरी आहे. आजकाल जगभरात आर्थिक हिताच्या नावाखाली राजकारण केले जात आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि “मत चोर”, “निवडणूक आयोग भाजपच्या खिशात”, “मतदार वंचितीकरण” असे नवे नारे देत संस्थात्मक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी “लहान मुले सुद्धा माझ्याकडे येऊन म्हणतात, ‘मत चोर गद्दी छोड’” अशा विधानांनीही त्यांनी वातावरण ढवळून काढले.या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींना सरळ शब्दात सांगितले होते की, “सात दिवसांत शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, अन्य पर्याय नाही”. २५ ऑगस्ट ही मुदत संपूनही राहुल गांधींनी शपथपत्र सादर केले नाही किंवा माफीही मागितली नाही.
५८ दिवसांनंतर, पोलिसांनी शनिवारी कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणात ६५० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यात मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, त्याचे दोन साथीदार जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी आणि कॉलेज सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जी यांची नावे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद, गुजरात दौऱ्यापूर्वी, गुन्हे शाखेने शनिवारी एलिसब्रिज रीगल हॉटेलमधून एका सीरियन नागरिकाला अटक केली. त्याचे नाव २३ वर्षीय अली मेघाट अल-अझहर असे आहे.
भारतानंतर, अनेक युरोपीय देशांनीही अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली आहे. यामध्ये भारत, इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. सेवा ठप्प करण्याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टॅरिफ नियम आहेत.
ED ने छापा टाकताच पळून जाण्यासाठी आमदाराची कुंपणावरून उडी; याला म्हणतात शूर ममतांच्या पक्षाची लढाईची तयारी!!, असे म्हणायची वेळ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या कृत्याने आणली. Jeevan Krishna Sah
रविवारी दिल्ली विधानसभेत अखिल भारतीय सभापती परिषदेचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ही परिषद दोन दिवस चालेल. २९ राज्यांच्या विधानसभांचे सभापती आणि सहा राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष आणि उपसभापती यात सहभागी झाले आहेत.
भारत सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिला करार संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड यांनी जर्मनीकडून ६ पाणबुड्या खरेदी करण्याचा आहे. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत भारतात बांधल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार ७० हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यानंतर आता आणखी एका काँग्रेस आमदाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) प्रार्थना गायली आहे.तुमकुरु जिल्ह्यातील कुनिगलचे आमदार एचडी रंगनाथ यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या ओळी वाचल्या आणि ते खूप चांगले गाणे असल्याचे म्हटले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ते गायले तेव्हा मी पहिल्यांदाच ते ऐकले. मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि आपण इतरांकडून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या विरोधातच घटना दुरुस्ती कायदा आणला. पंतप्रधान जर जेलमध्ये गेले, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल पण विरोधकांना जेलमध्ये गेल्यावर देखील तिथून सरकार चालवायचे आहे
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, परीक्षेतील गुण आणि रँक हे विद्यार्थी किती यशस्वी होईल हे ठरवत नाही. यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि समर्पणातून येते. गोव्यातील व्हीएम साळगावकर लॉ कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात ते बोलत होते.
एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला.
कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ईडीने वीरेंद्र यांच्या घरावर छापा टाकला.
उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षक आणि हाणला ठोका!!, हा प्रकार राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेत घडला. राहुल गांधींनी विश्वनाथ प्रताप सिंग यांची कॉपी मारून बिहारमध्ये मोटरसायकल वरून मतदार अधिकार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत तेजस्वी यादव देखील दुसऱ्या मोटरसायकलवर बसून त्या यात्रेत सामील झाले होते.
जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे असेल. जीएसटीशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेते. या परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.
आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील संघटनेने (SCWLA) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या टिप्पण्या धक्कादायक आणि अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. २० ऑगस्ट रोजी काटजू यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मला डोळा मारणाऱ्या महिला वकिलांच्या बाजूने मी निर्णय दिला.
ट्रम्पच्या शुल्काला प्रतिसाद म्हणून, भारतीय टपाल विभाग २५ ऑगस्टपासून अमेरिकेला सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग स्थगित करणार आहे. सध्या हा निर्णय तात्पुरता लागू केला जाईल.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३२ कोटी रुपयांची आहे. यातील सुमारे ५७% संपत्ती चंद्राबाबूंकडे आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??
व्यापार कराराबाबत अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, परंतु भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि लहान उत्पादकांच्या हितांशी तडजोड करणार नाही,असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, या करारातील काही मुद्द्यांवर भारताची ‘लाल रेषा’ निश्चित आहे. या लाल रेषा प्रामुख्याने आपल्या शेतकऱ्यांच्या आणि काही प्रमाणात लहान उत्पादकांच्या हितांशी संबं
ऑनलाइन मनी गेमिंगवरील बंदीनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने आज (२३ ऑगस्ट) एक नवीन वैयक्तिक वित्त अॅप लाँच केले आहे. हे ड्रीम मनी अॅप आर्थिक व्यवस्थापनासाठी काम करेल.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुग्राम आणि नवी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला. येथून, तंत्रज्ञानाच्या आधारे अमेरिकन नागरिकांना १५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १३० कोटी रुपये) फसवले गेले. एजन्सीने तीन आरोपींना अटक केली आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि आपल्यात कोणतेही “भांडण” झालेले नाही.शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत शेतकरी आणि लहान उत्पादकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App