लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याच्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपीला निर्दोष सोडले. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्काराचा गुन्हा नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओची घोषणा केली. त्यांनी सांगितले की हा आयपीओ पुढील वर्षी जूनपर्यंत येईल. हा आयपीओ जागतिक स्तरावर शेअरधारकांसाठी मूल्य अनलॉक करेल.
शुक्रवारी (२९ ऑगस्ट) भारतीय रुपया पहिल्यांदाच ८८ रुपयांच्या प्रति डॉलरच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रुपयातील ही घसरण अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कामुळे झाली आहे
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला विचारले की, त्यांना भारतीय सीमेवर अमेरिकेसारखी भिंत बांधायची आहे का? पश्चिम बंगाल स्थलांतरित कल्याण मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गाड्या वचा वेग कमी झालेला नाही. एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला असून, मागील पाच तिमाहीतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.
बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.
पश्चिम बंगालमध्ये घुसखाेरांना आश्रय देण्याचे काम तृणमूल काॅंग्रेस करत असल्याचे उघड सत्य आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरून . “गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे वक्तव्य तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ माेइत्रा यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झाेड उठली आहे.
विशेष प्रतिनिधी पणजीः Goa Chief Minister Pramod Sawant slams : बिहार दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातील बिठौली गावात निवडणूक प्रचार कार्यक्रमाच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान […]
कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!! बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.
बिहारमधील एनडीए आघाडीच्या जागावाटपाबाबतचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली भेटीनंतर, विधानसभा निवडणुकीतील जागांवर आघाडीतील पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले आहे.
बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या वोटर अधिकार यात्रेदरम्यान काही लोकांनी व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली. याप्रकरणी भाजपने पाटण्याच्या गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआरसाठी अर्ज दाखल केला आहे.
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करून कोणाला फायदा होत आहे आणि कोणाचे नुकसान होत आहे, हे आपण विचारले पाहिजे.
राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा बिहारमधील चिरैया आणि ढाका येथे पोहोचली, तेव्हा राजकीय वातावरण तापले. शिवहरच्या खासदार लवली आनंद यांनी या यात्रेला पूर्णपणे अपयशी ठरवले आणि काँग्रेसवर दशकांपासून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले- भाजप आणि संघ यांच्यात कोणताही वाद नाही. आमचे फक्त भाजप सरकारशीच नाही, तर सर्व सरकारांशी चांगले संबंध आहेत.सरकारमध्ये निर्णय घेण्याच्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, सरकारमध्ये सर्व काही संघ ठरवतो असे म्हणणे चुकीचे आहे. आपण सल्ला देऊ शकतो, पण निर्णय ते घेतात. जर आपण निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागला नसता.
सरकारने आता प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना २०३० पर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम स्वनिधी योजनेची पुनर्रचना करण्याचा म्हणजेच त्यात आणखी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कर्जाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने म्हटले की, विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कारवाईविरुद्ध राज्ये सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत. केंद्राने म्हटले की, राज्य सरकारे कलम ३२ वापरू शकत नाहीत. कारण मूलभूत अधिकार सामान्य नागरिकांसाठी आहेत, राज्यांसाठी नाहीत.
केंद्रातील मोदी सरकारने कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. आता कापड व्यापारी ३१ डिसेंबरपर्यंत आयात शुल्काशिवाय परदेशातून कापूस आयात करू शकतील. यापूर्वी सरकारने १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत यासाठी सूट दिली होती. कापड व्यापाऱ्यांना ५०% अमेरिकन टॅरिफच्या बोज्यातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी मंगळवारी तीव्र विरोध नोंदवला.
जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले.
२०३० मध्ये अहमदाबादेत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत दावा करणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बोली प्रस्तावाला मान्यता दिली. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) याला मान्यता दिली होती. आता भारताला ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बोली प्रस्ताव सादर करावा लागेल. यजमानपद द्यायचे की नाही हे नोव्हेंबरच्या अखेरीस ठरवले जाईल.
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला.
भारतासोबतच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका भारतासोबत चांगला करार करू शकेल अशी आशा बाळगून आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी बुधवारी एका मुलाखतीत सांगितले की, भारत-अमेरिका संबंध खूपच गुंतागुंतीचे आहेत, परंतु त्यांना विश्वास आहे की दोन्ही देश अखेर एकत्र येतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकले असा दावा करून राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही. असे असूनही, स्वयंसेवकांना समाजाबद्दल शुद्ध सात्विक प्रेम आहे. या प्रेमामुळे आता आमच्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App