खजुराहोतील जावरी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती उभी आहे. ही मूर्ती शतकांपूर्वी मुघल आक्रमणांदरम्यान शिरच्छेदित झाली आणि आजही भग्न अवस्थेत आहे. या मूर्तीची पुनर्स्थापना करून मंदिराची पवित्रता अबाधित करण्यासाठी राकेश दलाल या श्रद्धावान भक्ताने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की ही केवळ पुरातत्त्वाशी संबंधित बाब नाही, तर अखंड देवप्रतिमेची पूजा करण्याचा हा मूलभूत धार्मिक अधिकार आहे.
Good economics is bad politics, असा 1990 च्या दशकानंतर भारतात समज व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती हे खरे. कारण त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था सुधारणारे नेते राजकारणात मात्र जिंकण्याची चमक दाखवू शकले नव्हते. राजकीय प्रतिभेने हे नेते कमी नव्हते.
दुबईत आशिया कपच्या झालेल्या सामन्यात भारताचा भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान्यांचा राग अनावर झाला. त्यातही भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केले नाही म्हणून तो राग जास्तच भडकला. पाकिस्तानी क्रिकेट फोटो भारताविरुद्ध वाटेल ते बराळायला लागले. पण तरी देखील काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतातल्या राजकारणावर शेरेबाजी करून आपल्या पसंती क्रमात राहुल गांधींना सगळ्यांमध्ये वरचे स्थान दिले.
भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी टाटांनी पुढाकार घेतला असून त्यांनी अन्य भारतीय कंपन्यांनाही सहकार्याचा हात पुढे केला आहे. कारण भारतीय संरक्षण क्षेत्र केवळ मागणी आणि व्यापार एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर भारताची संरक्षण क्षमता जगात वाढविणे, भारताच्या वाढत्या गरजेनुसार संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतात करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, अशा शब्दांमध्ये टाटा संस्थेचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी टाटा सुमूहाची भूमिका स्पष्ट केली. नागपूर मध्ये सोलर सिस्टिम उद्योगाच्या पाहणीसाठी गेले होते.
आसाम मध्ये पैशासाठी हिंदू महिला अधिकाऱ्याने लँड जिहाद केल्याची धक्कादायक बाब चौकशी आणि तपासात समोर आली. संबंधित हिंदू महिला अधिकाऱ्याच्या घरी आसाम पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तिच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आढळली.
आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सांगितले की निवडणूक आयोग प्रक्रिया पाळत नाही. नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वाेच्च न्यायालयात केला आहे. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक पुढे ढकलाव्यात अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ५.१% पर्यंत खाली आला आहे. जुलैमध्ये तो ५.२% आणि जूनमध्ये ५.६% होता. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा त्यात घट झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी (१५ सप्टेंबर) बेरोजगारी दराचे आकडे जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी बिहारसाठी ४०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.
सोमवारी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. राहुल गांधी गुरुदासपूरच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेले होते. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावांकडे जाताच एसपी जुगराज सिंह यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना थांबवले. एसपींनी राहुल गांधींना सांगितले की पुढे पाकिस्तानची सीमा आहे आणि कुंपण तुटलेले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) वनतारा प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला क्लीन चिट दिली. तपास अहवाल रेकॉर्डवर घेत न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, एसआयटीने तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला आणि त्यात कोणतेही उल्लंघन आढळले नाही. वनताराने अनेक प्रकरणांत आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा चांगले काम केले आहे. हत्ती आणि इतर प्राण्यांचे अधिग्रहण कायदेशीर व योग्य आहे. अहवाल साहसी, सखोल आणि निःपक्षपाती आहे. त्यावर शंका घेण्यास वाव नाही. अशा याचिका वारंवार दाखल करणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर (४८) यांच्याविरुद्ध एका चालकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ च्या काही प्रमुख कलमांवर सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की संपूर्ण कायद्यावर बंदी घालण्याचा कोणताही आधार नाही, परंतु काही तरतुदी सध्या लागू करण्यापासून रोखण्यात आल्या आहेत. यामध्ये वक्फ घोषित करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ५ वर्षे मुस्लिम असणे आवश्यक असल्याच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाशिवाय वक्फ घोषित करण्याच्या तरतुदीवरही बंदी घालण्यात आली.
रशियन तेल खरेदीवर हे वेडेपण आहे असे म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापार धोरणांवर आणि रशियन तेल खरेदीवर टीका केली आहे.
निष्क्रिय असलेल्या राजकीय पक्षांद्वारे करचोरी आणि मनी लाँडरिंग हा एक गंभीर मुद्दा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याशी थेट संबंधित आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याला संपूर्ण स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सुधारणेतल्या काही विशिष्ट तरतुदींना तात्पुरती स्थगिती दिली.
tejasvi Yadav RJD
भाजप युवा मोर्चा (BJYM) ने बेगुसराय येथे युवा शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कनकौल येथील ऑडिटोरियम कम आर्ट गॅलरीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भारतेंदू मिश्रा यांनी युवकांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. मोदींनी दरंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जीएनएम स्कूल आणि बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याची किंमत ६३०० कोटी आहे. मोदी दरंग जिल्ह्यातील मंगलदोई आणि गोलाघाटमधील नुमालीगड रिफायनरीलाही भेट देतील.
देशात भटक्या कुत्र्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी प्राणीप्रेमींवर टीका केली. १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, मी अलीकडेच काही प्राणीप्रेमींना भेटलो. आपल्या देशात असे अनेक प्राणीप्रेमी आहेत आणि विशेष म्हणजे ते गायीला प्राणी मानत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी ९:३० वाजता १६ व्या कम्बाइंड कमांडर कॉन्फरन्स (सीसीसी) चे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी कोलकाता येथे पोहोचले. गेल्या एका महिन्यात बंगालचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे.
“तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणजे कायदा तुमच्यासाठी वाकणार नाही!” असा थेट संदेश देत गुजरात उच्च न्यायालयाने माजी क्रिकेटपटू आणि टीएमसी खासदार युसुफ पठाण यांची याचिका फेटाळली.
निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) चे सह-संस्थापक आणि निवडणूक सुधारणांचे कट्टर समर्थक असलेले प्रो. जगदीप एस. छोकर यांचे शुक्रवारी सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. प्रो. छोकर यांच्या इच्छेनुसार, त्यांचे शरीर संशोधनासाठी लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले आहे.
राज्यसभेचे सदस्य आणि विशेष सरकारी वकील अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याविरोधात आता कायदेशीर पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पक्षकार संघ या संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रेया आवले आणि ॲड. रोहित टिळेकर यांच्या माध्यमातून निकम यांच्या नियुक्ती वर आक्षेप घेत, केंद्र आणि राज्य शासनाकडे तातडीने घटनात्मक स्पष्टीकरण व कारवाईची मागणी करणारी नोटीस पाठवली आहे.
विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. या वेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App