कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त विधानांनंतर मध्य प्रदेश भाजपने आपल्या नेत्यांसाठी सार्वजनिक भाषण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर जून महिन्यात भोपाल येथे होणार असून, नेत्यांनी बोलताना होणाऱ्या चुकांपासून बचाव करावा आणि प्रभावी संवाद साधावा यावर भर दिला जाणार आहे.
“मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी ‘एक पद, एक पेन्शन’ देण्याचा आदेश दिला आहे.
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-१४ यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले आहेत. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले आहेत.
पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर मुंबईत मोठ्या बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आला आणि तेव्हापासून पोलिस हाय अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन रूम नंबर ११२ वर हा धमकीचा फोन आला होता आणि फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्रोने रविवारी सकाळी ५.५९ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे आपला १०१ वा उपग्रह EOS-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) प्रक्षेपित केला, परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही.
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या थेट निमंत्रणावर आयएसआयच्या संपर्कात येऊन तिकडे गेले होते आणि परतल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा तीव्र विरोध केला, असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीसमोर ऑपरेशन सिंदूर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाबाबत सविस्तर माहिती देतील.
दहशतवादावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दूर राहिली आहे. तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला कळवले
अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना नुकतीच बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी मालाडमधील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहेत. जर मालमत्ता मालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, मिथुन यांनी हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.
हरियाणातील लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सोनीपत पोलिसांनी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथून अटक केली आहे. अशोका विद्यापीठात शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर जठेडी गावच्या सरपंचाने राय पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
हा पुरस्कार सोहळा जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल
operation Sindoor च्या यशस्वी मोहिमे दरम्यान जगभरातल्या देशांमध्ये संदेश देण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात नेमका कुणाचा समावेश करायचा
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा भाचा आकाश आनंदवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाशला मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. म्हणजेच मायावतींनंतर आता आकाश पक्षात असेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, केरळ, झारखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या संदर्भाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
भारतासोबतच्या अलिकडच्या तणावाबाबत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी त्यांना ही जबाबदारी सोपवली.
भारताने शनिवारी व्यापार नियमांमध्ये बदल करत ईशान्येकडील भू-बंदरांमधून बांगलादेशातून फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्न, कापूस, प्लास्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली.
रविवारी सकाळी हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ८ मुलांचा समावेश आहे. त्याच वेळी, १० ते १५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी रजुल्लाह निजामानी उर्फ अबू सैफुल्लाह मारला गेला. पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली
केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा ५९ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे. त्यात ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. एनडीएचे ३१ आणि इतर पक्षांचे २० आहेत, ज्यामध्ये ३ काँग्रेस नेते देखील आहेत.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
आता आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे,” असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची सैनिकी ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली.
पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App