उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना दिलेला पाठिंबा काँग्रेससाठी वरदान की अडचण, यावरच आता चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देशभरात भव्य पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्याला ‘नवभारताचा रोडमॅप’ असे संबोधण्यात आले
ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या ब्रिक्स नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.
सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली.
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. अभिनेत्याच्या फाउंडेशनने पूरग्रस्त मदतीसाठी ५ बोटी पाठवल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि पंजाब पर्यटन अध्यक्ष दीपक बाली यांनी पूरग्रस्त फिरोजपूर गावाला भेट दिली आणि सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेने पाठवलेल्या बोटी प्रशासनाला सुपूर्द केल्या. यापैकी २ बोटी फिरोजपूर सीमेवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बोटी राज्यभरातील बचाव कार्यात वापरल्या जातील.
बारामुल्ला लोकसभा खासदार रशीद इंजिनियर यांच्यावर दिल्लीच्या तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी ते त्यांच्या बॅरेकमध्ये असताना एका ट्रान्सजेंडरने त्यांच्यावर हल्ला केला. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की रशीद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुरक्षित आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारा एनडीए खासदारांचा डिनरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच, शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भाजप खासदारांचा डिनरचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊ शकतात. हे ९ सप्टेंबर रोजी होऊ शकते. ज्यामध्ये मोदी पंजाबशिवाय हिमाचल आणि उत्तराखंडला भेट देऊ शकतात. पंजाबमध्ये ते गुरुदासपूरला जाऊ शकतात.
अमेरिका आता एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्या इतपत ती दुबळी झालीय का??, असा सवाल विचारायची वेळ एका अमेरिकन पत्रकार आणि विश्लेषकाच्या वक्तव्यामुळे समोर आली. Rick Sanchez
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सासाराम येथील फजलगंज स्टेडियममध्ये एनडीए आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नितीश कुमार हे फक्त निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्री राहतील. तेजस्वी यांनी दावा केला की, गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पुन्हा निवडले जातील.
जीएसटी दरांतील कपातीचा सामान्य माणसाला तत्काळ फायदा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात असताना केंद्राने स्पष्ट केले की, ग्राहकांना सवलतीचा पूर्ण फायदा मिळेल याची सरकार खातरजमा करेल. शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात सरकारची भूमिका मांडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्योगांनी करातील संपूर्ण कपात वस्तूंच्या किमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, केंद्राप्रमाणेच राज्यांनाही दुकानदार आणि कंपन्यांनी करातील कपातीचा पूर्ण फायदा सामान्य ग्राहकांना द्यावा याची खातरजमा करावी लागेल.
श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यावरील नव्याने बांधलेल्या दगडी फलकावर अशोक स्तंभाच्या कोरीवकामावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक लोक आणि नेत्यांनी आक्षेप घेतला आणि ते धार्मिक भावनांच्या विरोधात असल्याचे म्हटले.
भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले,
पुढील १५ वर्षांत भारतीय लष्कराला २२०० नवीन रणगाडे आणि ६ लाख शेल दिले जातील. लष्कराच्या तिन्ही शाखांना बळकटी देण्यासाठी एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज शस्त्रे आणि रडार देखील खरेदी केले जातील. नौदलाला एक नवीन विमानवाहू जहाज मिळेल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटणा जिल्ह्यातील पालीगंज भागात आयोजित दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सिकारिया गावात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले, तर दुल्हिन बाजार ब्लॉकमधील लाला भन्सारा गावात त्यांनी जननायक करपुरी ठाकूर पुस्तकालय भवनाचे उद्घाटन केले
अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.
गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षाने आणलेल्या ठरावावर चर्चा सुरू होती. यावेळी विरोधी पक्षाने (भाजप) घोषणाबाजी केली.
१ सप्टेंबर रोजी म्हैसूर येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) चा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या. प्रोटोकॉलनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील उपस्थित होते. स्वागत भाषणादरम्यान सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपतींना विचारले की त्यांना कन्नड भाषा येते का, कारण ते कन्नडमध्ये भाषण देणार होते.
दिल्ली : List of top 10 colleges : शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी फ्रेमवर्क (NIRF) अंतर्गत देशातील सर्वोत्तम 10 विद्यापीठे आणि महाविद्यालयांची यादी जाहीर […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : reservation in private schools : खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी आरक्षण […]
निवडणूक आयोग ऑक्टोबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दोन किंवा तीन टप्प्यात मतदान शक्य आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये मतदान होईल.
टॅरिफ वॉरच्या वाढत्या वाढीदरम्यान, भारतातील विमान उत्पादक कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (GE) यांच्यातील जेट इंजिनसाठीचे अनेक संरक्षण करार अंतिम टप्प्यात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात. तथापि, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पंतप्रधान मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.
ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!, असले राजकारण पश्चिम बंगाल मध्ये घडले. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या बंगाल फाइल्स सिनेमाचा उद्या प्रारंभ होत आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App